शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सहा हजार ट्रकच्या संपामुळे जिल्ह्यात मालवाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:28 IST

देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे. या संपाच्या कालावधीत ठाणे, नवी मुंबई परिसरातील सुमारे सहा हजार ट्रकची वाहतूक बंद राहणार आहे. सोमवार संध्याकाळपासून काही मालकांनी ट्रक जागेवर उभे केल्याचे पूनम ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मालक सुनील भोंडिवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशन (एआयएमआयसी) व आॅल इंडिया कॉन्फडरेशन आॅफ गुड्स व्हेइकल्स ओनर असोसिएशन (एआयसीजीव्हीओ) या संघटनांच्या नेतृत्वाखाली मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्या मालकांनी संपात सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातीलसुमारे सहा हजार ट्रकमालकांचा सहभाग आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील अन्य साहित्य वाहतुकीच्या बंदीमुळे बाजारपेठेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज भोंडिवले यांनी व्यक्त केला.देशभरातील अन्य ठिकाणी गेलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना २० जूनपर्यंत ठिकठिकाणी उभे राहण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, आमच्या गाड्या संध्याकाळीच आहे, त्या जागी उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचे भोंडिवले यांनी स्पष्ट केले.>जीवनावश्यक वस्तूंना वगळल्याने परिणाम नाहीजिल्ह्यात देशपातळीवर सुमारे दोन ट्रान्सपोर्ट असोसिएशन सक्रिय आहेत. त्यांच्याकडून ट्रकमालकांवर दबाव येण्याची शक्यता आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यात आल्यामुळे आपल्याकडे त्यांचा फारसा परिणाम होणार नाही. तरीदेखील या संपाच्या कालावधीतील हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.>आरटीओचे महामार्गांवरील वाहतुकीकडे लक्षयासंदर्भात आरटीओ अधिकारी जितेंद्र पाटील यांना विचारणा केली असता आज तरी काही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आमची यंत्रणा महामार्गांवरील वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. हा संप काही दिवस सतत सुरू राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोमवारी पहिल्या दिवशी दिल्ली परिसरात ट्रक मालवाहतुकीवर परिणाम झालेला असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.