शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सहा हजार ट्रकच्या संपामुळे जिल्ह्यात मालवाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:28 IST

देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे. या संपाच्या कालावधीत ठाणे, नवी मुंबई परिसरातील सुमारे सहा हजार ट्रकची वाहतूक बंद राहणार आहे. सोमवार संध्याकाळपासून काही मालकांनी ट्रक जागेवर उभे केल्याचे पूनम ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मालक सुनील भोंडिवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशन (एआयएमआयसी) व आॅल इंडिया कॉन्फडरेशन आॅफ गुड्स व्हेइकल्स ओनर असोसिएशन (एआयसीजीव्हीओ) या संघटनांच्या नेतृत्वाखाली मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्या मालकांनी संपात सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातीलसुमारे सहा हजार ट्रकमालकांचा सहभाग आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील अन्य साहित्य वाहतुकीच्या बंदीमुळे बाजारपेठेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज भोंडिवले यांनी व्यक्त केला.देशभरातील अन्य ठिकाणी गेलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना २० जूनपर्यंत ठिकठिकाणी उभे राहण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, आमच्या गाड्या संध्याकाळीच आहे, त्या जागी उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचे भोंडिवले यांनी स्पष्ट केले.>जीवनावश्यक वस्तूंना वगळल्याने परिणाम नाहीजिल्ह्यात देशपातळीवर सुमारे दोन ट्रान्सपोर्ट असोसिएशन सक्रिय आहेत. त्यांच्याकडून ट्रकमालकांवर दबाव येण्याची शक्यता आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यात आल्यामुळे आपल्याकडे त्यांचा फारसा परिणाम होणार नाही. तरीदेखील या संपाच्या कालावधीतील हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.>आरटीओचे महामार्गांवरील वाहतुकीकडे लक्षयासंदर्भात आरटीओ अधिकारी जितेंद्र पाटील यांना विचारणा केली असता आज तरी काही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आमची यंत्रणा महामार्गांवरील वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. हा संप काही दिवस सतत सुरू राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोमवारी पहिल्या दिवशी दिल्ली परिसरात ट्रक मालवाहतुकीवर परिणाम झालेला असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.