शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नाला बुजवून बेकायदा बांधकामे , नागरिक भीतीच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:48 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोढ्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले बांध वाहून गेले आहेत

धीरज परबमीरा रोड : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोढ्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले बांध वाहून गेले आहेत. तर खाली गावदेवी कंपाऊंड भागातून जाणाºया या नाल्याची भिंत कोसळू लागल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत. २००५ मध्ये येथील चाळ वाहून गेल्याने ९ जणांचा मृत्यू झाला होता. पालिका मात्र आजही सुमारे ३५ कुटुंबांना पावसाळ्याआधी घरे रिकामी करा म्हणून नोटीसच बजावते. वास्तविक नैसर्गिक ओढ्याच्या परिसरात बेकायदा भराव करुन चाळी व नाले बांधलेले असूनही कारवाई करण्याऐवजी महापालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे संरक्षण मिळत आहे.मीरा- भार्इंदर महापालिका हद्दीतील काशिमीरा महामार्गा जवळ महाजनवाडी परिसर आहे. पावसाळ्यात संरक्षित असलेल्या राष्ट्रीय उद्यानातील डोंगर - दºयांचे पाणी पूर्वी पासुनच नैसर्गिकरित्या काशिमीरा भागात वाहून येते. पाण्याचे हे प्रचंड लोंढे खूपच वेगाने खाली येतात. येताना ते दगड, झाडांचे ओंडके, माती आदी घेऊन येतात.परंतु या नैसर्गिक ओढ्यांमध्ये व परिसरात महापालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. सरकारी, आदिवासी जमिनींवर तर बेकायदा चाळी, गाळे बांधले गेले आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देतानाच पालिकेने सर्व सोयी सुविधा पुरवल्या आहेत.येथील गुजराती चाळ, बापा सिताराम मंदिर परिसर, गावदेवी कंपाऊंड आदी बैठ्या वसाहतीही उद्यानातून येणाºया नैसर्गिक ओढ्याच्या परिसरात बेकायदा उभ्या राहिल्या आहेत जेणेकरून २००५ मध्ये आलेल्या जलप्रलयात पाण्याच्या लोंढ्यामध्ये अडसर ठरलेली एक चाळ वाहून गेली होती. चाळीसोबत आतील ११ रहिवाशीही वाहून गेले होते. त्यातील ९ जणांचा मृत्यू झाला होता.इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही महापालिका व लोकप्रतिनिधींचे डोळे उघडले नाही. नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणाºया बेकायदा बांधकामांवर कारवाईच केलेली नाही. महाविष्णू मंदिराजवळील नाल्याजवळच्या दामू नांबियार चाळीच्या तीन खोल्या पाण्याच्या प्रवाहाने पडल्या होत्या. शिवाय पालिकेने बांधलेल्या नाल्याचा भागही पूर्वी दोन वेळा पाण्याच्या प्रवाहाने कोसळला होता.दरवर्षी पावसाळ्यात जंगलातून येणारा पाण्याचा प्रचंड वेगाने वाहणारा प्रवाह पाहून रहिवाशांच्या जीवाचा थरकाप उडतो. महापालिकेने यापूर्वी पावसाळ्याच्या आधी नाल्याजवळच्या ३५ खोल्यांना नोटीसा बजावल्या. पाण्याच्या प्रवाहामुळे जिवीतहानीचा धोका असल्याने घर रिकामी करा सांगण्याचे कागदी सोपस्कार उरकून पालिका हात वर करते. परंतु प्रत्यक्षात मात्र घरे कोणी रिकामी केली का? ते पाहिलं जात नाही.तत्कालिन नगरसेविका मंदाकिनी गावंड यांच्या पाठपुराव्यानंतर विक्रमकुमार हे आयुक्त असताना वस्तीकडे येणारा पाण्याचा वेग कमी करण्यासाठी जंगलातील ओढ्यात पाच ठिकाणी बांध बांधले होते. परंतु प्रवाहाच्या प्रचंड वेगात तेही टिकले नाहीत. शिवाय गावंड यांनी या भागात काँक्रिटचे नाले बांधण्याची केलेली मागणीही अमृत अभियानाअंतर्गत पर्जन्य जलवाहिनी टप्पा क्र. २ मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र कामाचा थांगपत्ता नाही.