शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

नाला बुजवून बेकायदा बांधकामे , नागरिक भीतीच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:48 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोढ्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले बांध वाहून गेले आहेत

धीरज परबमीरा रोड : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोढ्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले बांध वाहून गेले आहेत. तर खाली गावदेवी कंपाऊंड भागातून जाणाºया या नाल्याची भिंत कोसळू लागल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत. २००५ मध्ये येथील चाळ वाहून गेल्याने ९ जणांचा मृत्यू झाला होता. पालिका मात्र आजही सुमारे ३५ कुटुंबांना पावसाळ्याआधी घरे रिकामी करा म्हणून नोटीसच बजावते. वास्तविक नैसर्गिक ओढ्याच्या परिसरात बेकायदा भराव करुन चाळी व नाले बांधलेले असूनही कारवाई करण्याऐवजी महापालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे संरक्षण मिळत आहे.मीरा- भार्इंदर महापालिका हद्दीतील काशिमीरा महामार्गा जवळ महाजनवाडी परिसर आहे. पावसाळ्यात संरक्षित असलेल्या राष्ट्रीय उद्यानातील डोंगर - दºयांचे पाणी पूर्वी पासुनच नैसर्गिकरित्या काशिमीरा भागात वाहून येते. पाण्याचे हे प्रचंड लोंढे खूपच वेगाने खाली येतात. येताना ते दगड, झाडांचे ओंडके, माती आदी घेऊन येतात.परंतु या नैसर्गिक ओढ्यांमध्ये व परिसरात महापालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. सरकारी, आदिवासी जमिनींवर तर बेकायदा चाळी, गाळे बांधले गेले आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देतानाच पालिकेने सर्व सोयी सुविधा पुरवल्या आहेत.येथील गुजराती चाळ, बापा सिताराम मंदिर परिसर, गावदेवी कंपाऊंड आदी बैठ्या वसाहतीही उद्यानातून येणाºया नैसर्गिक ओढ्याच्या परिसरात बेकायदा उभ्या राहिल्या आहेत जेणेकरून २००५ मध्ये आलेल्या जलप्रलयात पाण्याच्या लोंढ्यामध्ये अडसर ठरलेली एक चाळ वाहून गेली होती. चाळीसोबत आतील ११ रहिवाशीही वाहून गेले होते. त्यातील ९ जणांचा मृत्यू झाला होता.इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही महापालिका व लोकप्रतिनिधींचे डोळे उघडले नाही. नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणाºया बेकायदा बांधकामांवर कारवाईच केलेली नाही. महाविष्णू मंदिराजवळील नाल्याजवळच्या दामू नांबियार चाळीच्या तीन खोल्या पाण्याच्या प्रवाहाने पडल्या होत्या. शिवाय पालिकेने बांधलेल्या नाल्याचा भागही पूर्वी दोन वेळा पाण्याच्या प्रवाहाने कोसळला होता.दरवर्षी पावसाळ्यात जंगलातून येणारा पाण्याचा प्रचंड वेगाने वाहणारा प्रवाह पाहून रहिवाशांच्या जीवाचा थरकाप उडतो. महापालिकेने यापूर्वी पावसाळ्याच्या आधी नाल्याजवळच्या ३५ खोल्यांना नोटीसा बजावल्या. पाण्याच्या प्रवाहामुळे जिवीतहानीचा धोका असल्याने घर रिकामी करा सांगण्याचे कागदी सोपस्कार उरकून पालिका हात वर करते. परंतु प्रत्यक्षात मात्र घरे कोणी रिकामी केली का? ते पाहिलं जात नाही.तत्कालिन नगरसेविका मंदाकिनी गावंड यांच्या पाठपुराव्यानंतर विक्रमकुमार हे आयुक्त असताना वस्तीकडे येणारा पाण्याचा वेग कमी करण्यासाठी जंगलातील ओढ्यात पाच ठिकाणी बांध बांधले होते. परंतु प्रवाहाच्या प्रचंड वेगात तेही टिकले नाहीत. शिवाय गावंड यांनी या भागात काँक्रिटचे नाले बांधण्याची केलेली मागणीही अमृत अभियानाअंतर्गत पर्जन्य जलवाहिनी टप्पा क्र. २ मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र कामाचा थांगपत्ता नाही.