शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:59 IST

केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले.

कल्याण : केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी पोलीस आयुक्तांलयाकडून परवानगी घेतल्याचे पत्र त्यांनी दाखवले आहे. याप्रकरणाची शहानिशा पोलीस करीत आहेत.सोनारपाडा येथे एका बिल्डरने जमीन घेतली असून, त्याला शेतकºयांचा विरोध आहे. शेतजमिनीवरील पिकपाण्याची नोंद व्हावी, यासाठी शेतकºयांनी कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी तहसीलदारांनी सोनारपाडा येथे जाऊन पीक पाण्याची नोंद केली होती.त्यानंतर दुपारी ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षण सुरू झाले. सर्वेक्षण करणाºया चौघांनी एकाचे शेत जाळले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पकडले. ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षणाची परवानगी कोणी दिली, ओळखपत्र आहे का, असे ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी कोणतीच माहिती दिली. त्यामुळे त्यांना बिल्डरने पाठविले असावे, असा ग्रामस्थांचा संशय बळावला. ग्रामस्थांनी चौघांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्याविरोधात बेकायदा जमिनाचे सर्वेक्षण करून शेत जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे.>सर्वेक्षण कशासाठी?ठाणे पोलीस आयुक्तांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी परवानगी दिल्याचे पत्र चौघांनी दाखवले आहे. त्यात महापालिकेच्या नगररचनाकार मा. द. राठोड यांना ही परवानगी दिली आहे.२७ गावांच्या विकासासंदर्भात हे सर्वेक्षण करायचे आहे, असे त्यात म्हटले आहे. २७ गावांचा विकास आराखडा तर २०१५ मध्ये मंजूर झालेला आहे, तर मग हे सर्वेक्षण कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी केली आहे.