शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:56 IST

रस्त्याचे काम अपूर्ण; नागरिकांना त्रास

उल्हासनगर : कॅम्प नं- २ रमाबाई आंबेडकरनगर येथील अर्धवट रस्त्यामुळे पाणी गळतीने भर रस्त्यात तळे निर्माण झाले आहे. डबक्यातून नागरिकांसह वाहनांना जावे लागत असून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.रमाबाई आंबेडकरनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले. मात्र संथ कामामुळे भररस्त्यात तळे साचले असून वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण करा असा आदेश बांधकाम विभागाचा असूनही संबंधित ठेकेदार, स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. रस्त्यावर खड्डे खणले असून पाणी साचून रस्त्यात डबके तयार झाले. शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आलेली आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. शहरात एकीकडे डांबरीकरण सुरू असून दुसरीकडे अनेक रस्त्यांची काम अर्धवट आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा बांधकाम विभागातील सावळागोंधळ उजेडात आला आहे. १८ कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शहाड ते महापालिका रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट आहेत.