शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चालकाने वाचवले ४५ प्रवाशांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:15 IST

ठाणे ते अलीमघरच्या दिशेने निघालेल्या टीएमटीचा पारसिकनगर येथे ब्रेक फेल झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे.

ठाणे : ठाणे ते अलीमघरच्या दिशेने निघालेल्या टीएमटीचा पारसिकनगर येथे ब्रेक फेल झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. चालकाने लागलीच गाडी रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खाली उतरवली. परंतु, या गडबडीत काही प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्यादेखील मारल्या. परंतु, सुदैवाने तेदेखील सुखरूप बचावले आहेत.ठाणे स्टेशन ते अलीमघर मार्गावर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने या बसच्या फेºया असल्याने तिला नेहमीच कोणत्याही वेळेस गर्दी असते. त्यामुळे दुपारची वेळ असतानादेखील या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी होते. ती पारसिकनगर येथे पोहोचली असता, येथील स्थानकावर प्रवाशांना उतरायचे होते. त्यामुळे चालक चोरगे यांनी बसचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्रेक काही लागला नाही. त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातही प्रवाशांना उतरायचे असल्याने त्यांनी बस थांबवण्याची विनंतीदेखील केली. परंतु, बस काही थांबत नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या वेळेस बसचा वेग कमी असल्याने उडी मारलेल्या प्रवाशांचा जीव वाचला. दरम्यान, उर्वरित प्रवाशांना वाचवण्यासाठी चालकाने गाडी तत्काळ रस्त्याच्या खाली उतरवली. या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने बस रस्त्याच्या खाली उतरताच थांबली अन् ती मधील सर्वच प्रवाशांचा जीव वाचला.