शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

By admin | Updated: July 5, 2017 06:19 IST

अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा कचरा टाकल्याचे समोर आले आहे. चिखलोली प्रकरणात कारवाई झाल्यावरही कंपन्यांना अजून धाक बसला नसल्याचेच यातून उघड झाले. या भागातील काही कंपन्या रासायनिक सांडपाणीही जमिनीत मुरवत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, शेती यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या अनंतनगर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारांनी त्यांच्या कंपनीतला कचरा हा प्रक्रिया केंद्रावर न टाकता एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरच फेकणे सुरू केले. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार समोर आल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाने दोषी कंपनीवर कारवाईही केली. त्या घटनेला १५ दिवसही उलटत नाहीत, तोच पुन्हा या भागातील जीआयपी टँक परिसरात रासायनिक कचरा आढळला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंते आणि अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कचऱ्याची पाहणी केली. येथे अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात असल्याचेही यावेळी समोर आले. त्यामुळे या प्रकरणात एमआयडीसीने पुढाकार घेत कंपन्यांत जागृती करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी केले. कंपन्यांकडून वारंवार वेगवेगळ््या ठिकाणी टाकला जाणारा कचरा थांबवण्यासाठी त्यांना सूचना देऊन त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा देण्याचे आदेशही त्यांनी दिले. याबाबत विशेष कार्यक्र म राबवण्यासाठी कंपन्या, पालिका प्रशासन, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि समाजसेवी संस्थांना एकत्र बोलावून बैठक करण्याचेही आदेश त्यांनी दिले. येत्या सोमवारी याबाबत संयुक्त बैठक पार पडणार आहे. ही तपासणी सुरू असताना काही कंपन्या बेकायदा जमिनीत सांडपाणी मुरवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला धोकाअंबरनाथ परिसरातील दोन धरणे रासायनिक कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका धडधडीतपणे समोर आला आहे. या पाण्याचे शुद्धीकरण होत असले, तरी त्यातून सर्व रसायने नष्ट होतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सुरक्षा नसलेली धरणे आणि त्यांच्या परिसरात कोणाचाही होणारा वावर किती धोकादायक बनू शकतो, ते समोर आले.