शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

By admin | Updated: July 5, 2017 06:19 IST

अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा कचरा टाकल्याचे समोर आले आहे. चिखलोली प्रकरणात कारवाई झाल्यावरही कंपन्यांना अजून धाक बसला नसल्याचेच यातून उघड झाले. या भागातील काही कंपन्या रासायनिक सांडपाणीही जमिनीत मुरवत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, शेती यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या अनंतनगर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारांनी त्यांच्या कंपनीतला कचरा हा प्रक्रिया केंद्रावर न टाकता एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरच फेकणे सुरू केले. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार समोर आल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाने दोषी कंपनीवर कारवाईही केली. त्या घटनेला १५ दिवसही उलटत नाहीत, तोच पुन्हा या भागातील जीआयपी टँक परिसरात रासायनिक कचरा आढळला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंते आणि अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कचऱ्याची पाहणी केली. येथे अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात असल्याचेही यावेळी समोर आले. त्यामुळे या प्रकरणात एमआयडीसीने पुढाकार घेत कंपन्यांत जागृती करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी केले. कंपन्यांकडून वारंवार वेगवेगळ््या ठिकाणी टाकला जाणारा कचरा थांबवण्यासाठी त्यांना सूचना देऊन त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा देण्याचे आदेशही त्यांनी दिले. याबाबत विशेष कार्यक्र म राबवण्यासाठी कंपन्या, पालिका प्रशासन, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि समाजसेवी संस्थांना एकत्र बोलावून बैठक करण्याचेही आदेश त्यांनी दिले. येत्या सोमवारी याबाबत संयुक्त बैठक पार पडणार आहे. ही तपासणी सुरू असताना काही कंपन्या बेकायदा जमिनीत सांडपाणी मुरवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला धोकाअंबरनाथ परिसरातील दोन धरणे रासायनिक कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका धडधडीतपणे समोर आला आहे. या पाण्याचे शुद्धीकरण होत असले, तरी त्यातून सर्व रसायने नष्ट होतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सुरक्षा नसलेली धरणे आणि त्यांच्या परिसरात कोणाचाही होणारा वावर किती धोकादायक बनू शकतो, ते समोर आले.