शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

पालघरमधील ८२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तातडीने कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:41 IST

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पालघर : पालघर जिल्ह्यातील बाडा पोखरण, धाकटी डहाणू परिसरातील ३० गावे, केळवे-माहीम परिसरातील २० गावे, उंबरपाडा-नंदाडे परिसरातील ३२ गावे अशा एकूण ८२ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करून तातडीने कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. त्या वेळी शिवसेना खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, मजीप्रा ठाणे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ तसेच अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील उंबरपाडा नंदाडे व १७ गावे नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संयुक्त समितीमार्फत राबविण्यात येत आहे.

ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी खा. गावित यांनी करीत धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकांना कमी पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे नवीन योजनेची आवश्यकता भासत होती. या बैठकीत करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने खडकोली बंधाºयातून जल जीवन मिशनमध्ये नवीन योजनेची आखणी करून प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले.

मोखाडा तालुक्यातील चास आणि गोमघर पाणीपुरवठा योजनेची कामे बंद असून ती त्वरित सुरू करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले. केळवे-माहीम व १८ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत सध्या पाणीपुरवठ्याचे वितरण वारंवार खंडित होत असल्यामुळे तसेच जलवाहिन्या जुनाट व कमी क्षमतेच्या असल्याने पुरेसे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.डहाणूतील बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून सतत फुटणाºया जलवाहिनीमुळे तसेच देखभाल व दुरुस्तीअभावी शेवटच्या टोकावरील गावांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ही बाब उपस्थित ग्रामस्थांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. देखभाल व दुरुस्तीसाठी ही योजना पालघरच्या जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी या वेळी दिले. चंडिगाव ते धाकटी डहाणू गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चिंचणी गावापासून स्वतंत्र पाइपलाइन किंवा नगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाइपलाइन टाकणे, यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याचा जल जीवन मिशनमध्ये समावेश करावा, असे निर्देशही या वेळी मंत्र्यांनी दिले.

टॅग्स :palgharपालघर