शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पालघरमधील ८२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तातडीने कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:41 IST

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पालघर : पालघर जिल्ह्यातील बाडा पोखरण, धाकटी डहाणू परिसरातील ३० गावे, केळवे-माहीम परिसरातील २० गावे, उंबरपाडा-नंदाडे परिसरातील ३२ गावे अशा एकूण ८२ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करून तातडीने कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. त्या वेळी शिवसेना खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, मजीप्रा ठाणे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ तसेच अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील उंबरपाडा नंदाडे व १७ गावे नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संयुक्त समितीमार्फत राबविण्यात येत आहे.

ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी खा. गावित यांनी करीत धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकांना कमी पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे नवीन योजनेची आवश्यकता भासत होती. या बैठकीत करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने खडकोली बंधाºयातून जल जीवन मिशनमध्ये नवीन योजनेची आखणी करून प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले.

मोखाडा तालुक्यातील चास आणि गोमघर पाणीपुरवठा योजनेची कामे बंद असून ती त्वरित सुरू करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले. केळवे-माहीम व १८ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत सध्या पाणीपुरवठ्याचे वितरण वारंवार खंडित होत असल्यामुळे तसेच जलवाहिन्या जुनाट व कमी क्षमतेच्या असल्याने पुरेसे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.डहाणूतील बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून सतत फुटणाºया जलवाहिनीमुळे तसेच देखभाल व दुरुस्तीअभावी शेवटच्या टोकावरील गावांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ही बाब उपस्थित ग्रामस्थांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. देखभाल व दुरुस्तीसाठी ही योजना पालघरच्या जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी या वेळी दिले. चंडिगाव ते धाकटी डहाणू गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चिंचणी गावापासून स्वतंत्र पाइपलाइन किंवा नगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाइपलाइन टाकणे, यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याचा जल जीवन मिशनमध्ये समावेश करावा, असे निर्देशही या वेळी मंत्र्यांनी दिले.

टॅग्स :palgharपालघर