शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कमी पाणी प्यायल्याने होऊ शकतो किडनी स्टोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:44 IST

स्टार १२१० अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्याला अपायकारक ठरू शकते. तसेच ...

स्टार १२१०

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्याला अपायकारक ठरू शकते. तसेच कमी पाणी पिणे हेही शरीराला अपायकारक ठरू शकते, त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी प्रमाणात प्यायला हवे, दिवसभरात पुरुषांनी साडेतीन लिटर, महिलांनी अडीच ते तीन लिटर पाणी आवर्जून प्यावे.

कामावर जाणाऱ्या महिला फार कमी पाणी पीत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे त्यांच्यात किडनी स्टोनसह अन्य तक्रारी वाढत आहेत. नोकरदार महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी एसी, थंड हवामान असते तिथे पाणी कमी प्यायले जाते. मात्र, बांधकाम साईट, उन्हात फिल्डवरील काम असते त्यांना पाणी जास्त लागते. या सर्व बाबी आपण कोठे काम करतो त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नेमकं किती पाणी प्यायला हवे, असे निश्चित सांगता येत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

-----------------------

शरीरात पाणी कमी पडले तर...

- किडनी स्टोन होऊ शकतो

- हृदयाचे विकार होऊ शकतात

- फुफ्फुसांना धोका होऊ शकतो

-----------------

शरीरात पाणी जास्त झाले तर...

- ज्यांना लिव्हरचा त्रास आहे त्यांनी जास्त पाणी पिऊ नये

- हृदयाचे आजार असलेल्यानी जास्त पाणी पिऊ नये

------------------

कुणाचे किती वय आहे, यानुसार पाणी पिणे अपेक्षित नसून उंची, वजन, वय यावर पाणी पिणे अवलंबून असते. तरीही साधारणपणे प्रत्येक व्यक्तीने दिवसाला तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते.

---------------

जास्त पाणी पिणे चांगले असले तरीही त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणी पिणे महत्त्वाचे असते. कमी पाणी प्यायल्याने किडनी स्टोन, डिहायड्रेशन होऊ शकते तसेच थकवा जाणवू शकतो. लिव्हर, हृदयाचा त्रास असलेल्यांनी जास्त पाणी पिऊ नये. पाणी प्रमाणात पिणे चांगले.

- डॉ. दिनेश महाजन, नेफ्रॉलॉजिस्ट

...........