शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

विहिरीतील पाणीही आता पिण्यासाठी

By admin | Updated: October 13, 2016 03:45 IST

शहराला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना अधिक प्रमाणात करावा लागला नसला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी

ठाणे : शहराला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना अधिक प्रमाणात करावा लागला नसला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी वापरात आणण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात अस्तित्वात असलेल्या विहिरींची सफाई करून त्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, जलशुद्धीकरणाची ही प्रक्रिया बीओटी तत्त्वावर राबवली जाणार असून शुद्ध केलेले पाणी महापालिका संबंधित यंत्रणेकडून विकत घेणार आहे. ठाणे शहराला आजघडीला रोज सुमारे ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ते मुबलक असतानादेखील मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शहरात पाणीकपात सुरू होती. परंतु, त्याची झळ ठाणेकरांना फारशी सहन करावी लागलेली नाही. असे असले तरी आता उपलब्ध जलस्रोतांकडे पालिकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, शहरात असलेल्या आणि दूषित झालेल्या विहिरींची शोधमोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्यानुसार, शहराच्या विविध भागांत ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली. परंतु, यातील काही विहिरी पडीक, वापरात नसणे, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, तर काही कोरड्या पडल्या होत्या. काहींमध्ये गटारांचे पाणी गेल्याने ४० टक्के भूगर्भजलातील पाणीसाठा अशा विविध कारणांमुळे दूषित झाल्याची माहितीही या सर्व्हेत पुढे आली होती. त्यामुळे वापरात नसलेल्या विहिरींची संख्या २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ३३९ वर आली आहे. या विहिरींतील पाण्याच्या साठ्याचे मोजमाप ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी वापरास व पिण्यास अयोग्य असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत, त्यातील पाणी उपयोगात आणण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, पालिकेने यंदा या विहिरींतील गाळ काढण्याचे काम सुरू करून सुमारे १३० विहिरी स्वच्छ केल्या आहेत.

घोडबंदर, मुंब्रा आणि दिव्याची पाणी वितरण व्यवस्था आणि मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम पालिकेने तत्कालीन केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी या दोन्ही योजनांचा ६५० कोटींचा एकत्रित प्रकल्प अहवाल केंद्राकडे सादर केला होता. मात्र, एवढा निधी देता येत नसल्याचे कारण केंद्राने पुढे केले होते. त्यानंतर, आलेल्या भाजपा सरकारने जेएनएनयूआरएम ही योजनाच बंद केल्याने पालिकेने अहवाल बासनात गुंडाळला होता. परंतु, आता पुन्हा यात काही किरकोळ फेरबदल करून तो तयार केला असून या दोन्ही कामांसाठी सुमारे तेवढाच निधी खर्र्च केला जाणार आहे.सध्या घोडबंदरला ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. परंतु, येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यानुसार, महापालिकेने येथील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचे ठरवले आहे. पाणी वितरण व्यवस्थेच्या कामात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे, पंपहाउस, पंपिंग मशिनरी, बल्क मीटर बसवणे, आॅटोमेशन आणि स्काडा प्रणाली, स्टाफ क्वॉटर बांधणे, गळती संशोधनाकरिता उपकरणे खरेदी करणे, नळजोडण्या अशी कामे केली जाणार आहेत.