शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण गरजेची आहे : उत्तम जोगदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा ...

ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा मूल्यांचा संविधानात समावेश केला. ही मूल्ये समाजात रुजवण्याचे कार्य आतापर्यंत कायद्याच्या, संविधानाच्या मदतीने चालू होते. पण गेल्या ६-७ वर्षांत त्याला सुरुंग लागत असलेला आपण पाहत आहोत. लोकशाही समाजवाद उतरंडीला लागून भांडवलशाही प्रबळ होते आहे. दुर्बळांना न्याय मिळेनासा झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची घसरण होते आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही शिकवण आज अधिकच उपयोगी ठरणार आहे आणि तिचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम जोगदंड यांनी काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सद्य:स्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. झूमवर झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले.

सुप्रसिद्ध लेखक आणि अनुवादक अमरनाथ सिंग म्हणाले, आंबेडकरांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांची अस्मिता जागृत केली आणि त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याबरोबर उभे केले. पण तरीही त्यांना एका जातीत बंदिस्त करणे बरोबर नाही, ते फक्त दलितांचे नाहीत तर सर्व समाजाचे प्रतिनिधी होते. संविधानात समतेचे, लोकशाहीचे मूल्य असूनही आजही समाजातून विषमता नष्ट झाली नाही. जातिव्यवस्थेची जबरदस्त पकड समाजावर आहे. ती नष्ट झाल्याशिवाय सर्वांचा विकास होणे शक्य नाही. हा मूलभूत बदल होण्यासाठी कायद्याने प्रयत्न होत आले तरी लोकांकडून त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. यासाठीच बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करा, हा विचार आज महत्त्वाचा आहे.

-------

जोड बातमी पुढे