शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण गरजेची आहे : उत्तम जोगदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा ...

ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा मूल्यांचा संविधानात समावेश केला. ही मूल्ये समाजात रुजवण्याचे कार्य आतापर्यंत कायद्याच्या, संविधानाच्या मदतीने चालू होते. पण गेल्या ६-७ वर्षांत त्याला सुरुंग लागत असलेला आपण पाहत आहोत. लोकशाही समाजवाद उतरंडीला लागून भांडवलशाही प्रबळ होते आहे. दुर्बळांना न्याय मिळेनासा झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची घसरण होते आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही शिकवण आज अधिकच उपयोगी ठरणार आहे आणि तिचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम जोगदंड यांनी काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सद्य:स्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. झूमवर झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले.

सुप्रसिद्ध लेखक आणि अनुवादक अमरनाथ सिंग म्हणाले, आंबेडकरांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांची अस्मिता जागृत केली आणि त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याबरोबर उभे केले. पण तरीही त्यांना एका जातीत बंदिस्त करणे बरोबर नाही, ते फक्त दलितांचे नाहीत तर सर्व समाजाचे प्रतिनिधी होते. संविधानात समतेचे, लोकशाहीचे मूल्य असूनही आजही समाजातून विषमता नष्ट झाली नाही. जातिव्यवस्थेची जबरदस्त पकड समाजावर आहे. ती नष्ट झाल्याशिवाय सर्वांचा विकास होणे शक्य नाही. हा मूलभूत बदल होण्यासाठी कायद्याने प्रयत्न होत आले तरी लोकांकडून त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. यासाठीच बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करा, हा विचार आज महत्त्वाचा आहे.

-------

जोड बातमी पुढे