शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण गरजेची आहे : उत्तम जोगदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा ...

ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा मूल्यांचा संविधानात समावेश केला. ही मूल्ये समाजात रुजवण्याचे कार्य आतापर्यंत कायद्याच्या, संविधानाच्या मदतीने चालू होते. पण गेल्या ६-७ वर्षांत त्याला सुरुंग लागत असलेला आपण पाहत आहोत. लोकशाही समाजवाद उतरंडीला लागून भांडवलशाही प्रबळ होते आहे. दुर्बळांना न्याय मिळेनासा झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची घसरण होते आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही शिकवण आज अधिकच उपयोगी ठरणार आहे आणि तिचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम जोगदंड यांनी काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सद्य:स्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. झूमवर झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले.

सुप्रसिद्ध लेखक आणि अनुवादक अमरनाथ सिंग म्हणाले, आंबेडकरांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांची अस्मिता जागृत केली आणि त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याबरोबर उभे केले. पण तरीही त्यांना एका जातीत बंदिस्त करणे बरोबर नाही, ते फक्त दलितांचे नाहीत तर सर्व समाजाचे प्रतिनिधी होते. संविधानात समतेचे, लोकशाहीचे मूल्य असूनही आजही समाजातून विषमता नष्ट झाली नाही. जातिव्यवस्थेची जबरदस्त पकड समाजावर आहे. ती नष्ट झाल्याशिवाय सर्वांचा विकास होणे शक्य नाही. हा मूलभूत बदल होण्यासाठी कायद्याने प्रयत्न होत आले तरी लोकांकडून त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. यासाठीच बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करा, हा विचार आज महत्त्वाचा आहे.

-------

जोड बातमी पुढे