शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

डॉ. अन्सारी लढणार निवडणूक

By admin | Updated: May 13, 2017 00:48 IST

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निकाली काढल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निकाली काढल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यापैकी डॉ. नूर अन्सारी यांना निवडणूक लढविण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे.समाजवादीचे उमेदवार सगीर बशीर खान यांनी प्रभाग क्रमांक १० क साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आॅनलाईन अर्जात क ऐवजी ब नमूद केल्याने छाननीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला होता. तर प्रभाग ९ मध्ये अर्ज दाखल केलेल्या अख्तर केबलवाला यांना तीन अपत्य असल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवाराने निदर्शनास आणून दिले. मात्र एका मुलाचे निधन झाले असून, त्याचा मृत्यूचा दाखला जमा करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांचा अर्ज बाद केला. काँग्रेस पक्षाच्या डॉ. नूर अन्सारी यांनी मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेला व्हीप न पाळल्याने त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येऊ नये म्हणून निलंबित केले होते. या निवडणुकीत अन्सारी यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी छाननीच्यावेळी हरकत घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे या तीन उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यापैकी अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात ते उभे ठाकले आहेत.भाजपा खासदारांचा मुक्काम पद्मानगरमध्ये भिवंडी : निवडणुकीतील उमेदवार सुमीत पाटील याला निवडून आणण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पद्मानगर भागात मुक्काम ठोकला आहे. प्रभाग क्रमांक १७ चे उमेदवार सुमीत पाटील हे खासदार पाटील यांचे पुतणे असून महापौरपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे या भागातील अपक्ष उमेदवारांच्या समजूती काढणे व मंडळाच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रभागात तेलगू समाजाचा कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहतो. या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पंचाला ‘पेदामंची’ असे संबोधले जाते. त्यांना समाजाकडून मान मिळत असल्याने त्याची भेट घेत उमेदवार निवडून येण्याच्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे. भाजपाचे शहराध्यक्ष संतोष शेट्टीही याच प्रभागात उभे असल्याने या प्रभागाकडे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे लक्ष असून शिवसेनेच्या उमेदवारासाठी आमदार रूपेश म्हात्रे हे स्वत: मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.फं्रटची याचिका फेटाळलीमतदारयादीतील घोळाबाबत भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊन ती निकालात काढली.दुबार व बोगस नावांबाबत उच्च न्यायालयाने निर्णय न दिल्याने तसेच त्याचा उल्लेख नसल्याने फ्रन्टच्यावतीने फाजील अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही याचिका निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दाखल होणे अपेक्षित होते. निवडणुकीत अशा समस्या असतात. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध समस्यांवर अनेक तक्रारी दाखल होतील. त्यासाठी ही प्रक्रिया थांबविता येत नाही असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने याचिका निकालात काढली आणि उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.