शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 17:02 IST

ठाणे नगर वाचन मंदिर तर्फे शनिवार 9 जून रोजी सायं. 6 वा. ठाणो नगर वाचन मंदिराचे, वा.अ.रेगे सभागृह  येथे डॉ. अरुणा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

ठळक मुद्देआरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदाचे काम आहे - डॉ. अरुणा टिळक व्यासपीठावर अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित

ठाणे : ठाणे नगर वाचन मंदिराच्यावतीने डॉ.अरुणा टिळक यांचे ' आरोग्यदायी जीवनशैली ' विषयावर जाहीर व्याख्यान शनिवारी आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर ठाणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते. 

    स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदाचे काम आहे. त्यामुळे आपली जीवनशैली आयुर्वेदानुसार ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो. मात्र आपल्या चुकीच्या जीवनपध्दती मुळे आपल्याला आजार जडतात. सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठणे अपेक्षित आहे. त्यानंतर दंतमंजन केल्यास ते दातांच्या तंदुरुस्ती साठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे दातांची निगा चांगली राखली जाते आणि त्याचबरोबर पोटातील अग्नी प्रज्जवलित होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. अनेकदा आपल्याला सांगितले जाते सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी प्या ,मात्र आयुर्वेदानुसार असे करणे चुकीचे असून अधिक पाणी शरीरासाठी आणि आतड्यांसाठी हानिकारक आहे. पाणी पिणे हे आवश्यक असले तरी बदलत्या ऋतूनुसार पाणी पिण्याच्या सवयी बदलण्याचे आवाहन डॉ. टिळक यांनी केले. आज आपल्या चुकीच्या आहार आणि विहारच्या गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच आपण आजीबाईच्या बटवा आणि त्यातील उपचार पद्धती या विसरून गेली आहोत. त्यामुळे साधं पडसं झाले तरी आपण स्पेशालिस्ट डॉकटरकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.अनेकदा आपल्याला सांगितले जाते दिवसातून दोन दोन तासाने काहीतरी खा मात्र हे पूर्ण चुकीचे असून तुम्हाला खरंच भूक लागेल तेव्हा खा आणि तहान लागेल तेव्हाच पाणी प्या असा सल्ला डॉ. टिळक यांनी दिला.आपल्याकडे केवळ दिवाळी मध्ये अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे . मात्र तरुणपिढीला ते देखील आवडत नाही असे नमूद करत रोज सर्वांनी अभ्यंगस्नान केले पाहिजे. असे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले. अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मऊ होऊन तुकतुकीत राहत असल्याचे सांगितले.आजकाल जिम चं फॅड असल्यामुळे त्याकडे अधिक आकर्षण वाढत आहे. मात्र व्यायाम करताना सुर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार सारखा उत्तम व्यायाम कोणता नाही असे त्यांनी नमूद केले. आज ज्या घरात ज्येष्ठ व्यक्ति आहेत. त्या आपल्याला नेहमी तंदुरुस्त दिसून येतात.कारण पूर्वीच्या काळी लोक दिवसातून फक्त दोनदा जेवत असत. त्यामुळे ते कायम निरोगी राहत असत.अनेकदा लोकांना जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय असते मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असून जेवणाची सुरुवात ही नेहमी गोड पदार्थ खाऊन करा असे आवाहन डॉ.टिळक यांनी करत सरतेशेवटी आपण आपली जीवनशैली सुधारली तर आपल्याला कोणताच आजार होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई