शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

...तर उद्योगांना दुप्पट दंड

By admin | Updated: April 25, 2016 02:59 IST

ठाणे जिल्ह्यातील उल्हास, वालधुनीसह इतर पाणीस्रोत प्रदूषित झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला असताना

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हास, वालधुनीसह इतर पाणीस्रोत प्रदूषित झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला असताना आता राज्यातील पाण्याच्या दर्जात वाढ करण्यासह त्याचे जतन करण्यासाठी राज्य्ाांच्या जलसंपदा विभागाने जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या उद्योगांसह इतर घटकांना वठणीवर आणण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यानुसार, प्रत्येक उद्योगाने यापुढे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर पूर्ण प्रक्रिया केली नाही तर त्या उद्योगास दुप्पट दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक उद्योगाने नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्या पाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमानुसारच त्यावर प्रक्रिया करून नंतर ते सोडावे, असे नमूद केले आहे. तसे न केल्यास मंडळाने घालून दिलेल्या दंडाच्या दुप्पट रक्कम आकारली जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अखत्यारीतील औद्योगिक व वाणिज्यिक पाणी वापरकर्त्यांची यादी, त्यांचा मूळ मंजूर पाणीकोटा, पाण्याचा उद्भव याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाजवळ प्रदूषण नियंत्रण मंडळास उपलब्ध करून द्यावी. जे उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषानुसार प्रक्रिया केलेले पाणी नैसर्गिक पाणीस्रोतात सोडत नसतील तर त्यांची यादी मंडळाने जलसंपदा विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांना कळवणे बंधनकारक केले आहे. पाणी तपासणीत काही आढळल्यास त्या तारखेपासूनच दुप्पट आकारणी करावी तसेच त्या पाणीवापरकर्त्याचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले असतील तर त्या ग्राहकांचा पाणीपुरवठा विभागाने तत्काळ खंडित करावा, असेही स्पष्ट केले आहे.