शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील रस्त्यांवर होतेय डबल पार्किंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

कल्याण : पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाला आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यातच दुसरीकडे बाजारात ...

कल्याण : पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाला आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यातच दुसरीकडे बाजारात खरेदीसाठी येणारे वाहनधारक एकापाठोपाठ वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र महमद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान पाहायला मिळते.

महमद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पश्चिमेतील महत्त्वाचा रस्ता आहे. केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, दुकानदारांचे पदपथावर आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण पाहता रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूककोंडीची समस्या कायम राहिल्याचे सकाळ-सायंकाळी पाहायला मिळते.

कोरोना डेल्टा प्लस व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुपारी ४ पर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानांना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून या रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी दुचाकी पी १; पी २ प्रमाणे उभ्या केल्या जातात. परंतु, या दुचाकींच्या पाठीमागे बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्क करत आहेत. यात कार, जीपसह अन्य वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग व्यापला जात आहे. यात तेथून जाणाऱ्या अन्य वाहनांना अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

कारवाईची अपेक्षा

दुकानदारांचे पदपथावर आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाकडे केडीएमसीचा कानाडोळा झाला आहे. त्यात पुरेशा वाहनतळाअभावी अशा प्रकारे वाहने उभी केली जात असली तरी वाहतूककोंडीला हातभार लावणाऱ्या या कृतीविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला, हवी अशी मागणी होत आहे.

--------------

आनंद मोरे फोटो