शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कल्याणमधील रस्त्यांवर होतेय डबल पार्किंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

कल्याण : पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाला आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यातच दुसरीकडे बाजारात ...

कल्याण : पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाला आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यातच दुसरीकडे बाजारात खरेदीसाठी येणारे वाहनधारक एकापाठोपाठ वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र महमद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान पाहायला मिळते.

महमद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पश्चिमेतील महत्त्वाचा रस्ता आहे. केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, दुकानदारांचे पदपथावर आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण पाहता रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूककोंडीची समस्या कायम राहिल्याचे सकाळ-सायंकाळी पाहायला मिळते.

कोरोना डेल्टा प्लस व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुपारी ४ पर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानांना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून या रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी दुचाकी पी १; पी २ प्रमाणे उभ्या केल्या जातात. परंतु, या दुचाकींच्या पाठीमागे बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्क करत आहेत. यात कार, जीपसह अन्य वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग व्यापला जात आहे. यात तेथून जाणाऱ्या अन्य वाहनांना अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

कारवाईची अपेक्षा

दुकानदारांचे पदपथावर आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाकडे केडीएमसीचा कानाडोळा झाला आहे. त्यात पुरेशा वाहनतळाअभावी अशा प्रकारे वाहने उभी केली जात असली तरी वाहतूककोंडीला हातभार लावणाऱ्या या कृतीविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला, हवी अशी मागणी होत आहे.

--------------

आनंद मोरे फोटो