शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

‘आश्वासनांचेच पूल, डोंबिवलीकरांना कायम हूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

कल्याण : कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे केडीएमसीने स्पष्ट केले आहे. परंतु, पुलाचे काम संथगतीने ...

कल्याण : कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे केडीएमसीने स्पष्ट केले आहे. परंतु, पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने ‘आश्वासनांचेच पूल आणि डोंबिवलीकरांना कायम हूल’, अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले की, मनपाला कोरोना इन्होव्हेशन अवॉर्ड नुकताच केंद्र सरकारकडून मिळाला आहे. कोपर पुलाचे काम रखडल्याने मनपास ‘आश्वासनवाले प्रशासन’ असा एक पुरस्कार द्यायला हरकत नाही. प्रशासनाने कधी कोरोनाचे तर कधी पावसाचे कारण देत लोकांची गैरसोय अजून वाढवून ठेवली आहे. यापूर्वी प्रशासनाने आश्वासन दिले होते की, हा पूल सहा महिन्यांत खुला करू. त्यानंतर हा पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार. मात्र पूल काही पूर्ण झालेला नाही. त्यानंतर जुलैपर्यंत काम होईल, असे सांगितले. आता ऑगस्टची डेडलाइन दिली गेली आहे. त्यामुळे हा आश्वासनांचा पूल बनला आहे. तारीख पे तारीख, शिवाय मनपाकडे उपाय नसेल तर त्यांनी तसे सांगावे. त्यावर आम्ही उपाय सांगतो.

दरम्यान, आम्हाला आमचा हरवलेला पूल हवा आहे, या आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच केडीएमसी प्रशासनासही पाठविली आहे.

------------------------------