शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकीचे नियम पाळण्यात कमीपणा बाळगू नका- आशुतोष डुंबरे

By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2024 19:00 IST

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता.

ठाणे: वाहतूकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वत:बरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी दिला.

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळया घटकांच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते, तर दोन दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सिटबेल्ट लावणे, हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.

तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्याथ्यार्र्बरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्व जाणले पाहिजे. विद्यारथ्यार्ंनीच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही डॉ. चव्हाण म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात दहा टक्के म्हणजे १७ हजार मृत्यू आणि ५० हजार जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदी उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रीप्टही यावेळी ‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी प्रस्तावना करुन वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले. तर सहायक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले.

असे झाले बक्षीस वितरण

वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आयोजिलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम राज सावंत (अंबरनाथ), द्वीतीय अलिफिया अन्सारी (श्रीरंग, ठाणे) आणि तृतीय वेदांत कोचरे (श्री माँ बालनिकेतन) तर रिल्स स्पर्धेत श्रेयस पांचाळ, विवेक यादव आणि ऋषिकेश पाटील हे विजेते ठरले. त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये रोहित मालेकर, आर्या अंबुरे आणि रंजन किणी यांनी बक्षीस मिळवले.

टॅग्स :thaneठाणे