शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाहतूकीचे नियम पाळण्यात कमीपणा बाळगू नका- आशुतोष डुंबरे

By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2024 19:00 IST

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता.

ठाणे: वाहतूकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वत:बरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी दिला.

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळया घटकांच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते, तर दोन दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सिटबेल्ट लावणे, हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.

तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्याथ्यार्र्बरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्व जाणले पाहिजे. विद्यारथ्यार्ंनीच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही डॉ. चव्हाण म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात दहा टक्के म्हणजे १७ हजार मृत्यू आणि ५० हजार जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदी उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रीप्टही यावेळी ‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी प्रस्तावना करुन वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले. तर सहायक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले.

असे झाले बक्षीस वितरण

वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आयोजिलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम राज सावंत (अंबरनाथ), द्वीतीय अलिफिया अन्सारी (श्रीरंग, ठाणे) आणि तृतीय वेदांत कोचरे (श्री माँ बालनिकेतन) तर रिल्स स्पर्धेत श्रेयस पांचाळ, विवेक यादव आणि ऋषिकेश पाटील हे विजेते ठरले. त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये रोहित मालेकर, आर्या अंबुरे आणि रंजन किणी यांनी बक्षीस मिळवले.

टॅग्स :thaneठाणे