शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वाहतूकीचे नियम पाळण्यात कमीपणा बाळगू नका- आशुतोष डुंबरे

By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2024 19:00 IST

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता.

ठाणे: वाहतूकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वत:बरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी दिला.

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळया घटकांच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते, तर दोन दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सिटबेल्ट लावणे, हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.

तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्याथ्यार्र्बरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्व जाणले पाहिजे. विद्यारथ्यार्ंनीच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही डॉ. चव्हाण म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात दहा टक्के म्हणजे १७ हजार मृत्यू आणि ५० हजार जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदी उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रीप्टही यावेळी ‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी प्रस्तावना करुन वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले. तर सहायक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले.

असे झाले बक्षीस वितरण

वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आयोजिलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम राज सावंत (अंबरनाथ), द्वीतीय अलिफिया अन्सारी (श्रीरंग, ठाणे) आणि तृतीय वेदांत कोचरे (श्री माँ बालनिकेतन) तर रिल्स स्पर्धेत श्रेयस पांचाळ, विवेक यादव आणि ऋषिकेश पाटील हे विजेते ठरले. त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये रोहित मालेकर, आर्या अंबुरे आणि रंजन किणी यांनी बक्षीस मिळवले.

टॅग्स :thaneठाणे