शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

वाहतूकीचे नियम पाळण्यात कमीपणा बाळगू नका- आशुतोष डुंबरे

By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2024 19:00 IST

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता.

ठाणे: वाहतूकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वत:बरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी दिला.

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळया घटकांच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते, तर दोन दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सिटबेल्ट लावणे, हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.

तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्याथ्यार्र्बरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्व जाणले पाहिजे. विद्यारथ्यार्ंनीच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही डॉ. चव्हाण म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात दहा टक्के म्हणजे १७ हजार मृत्यू आणि ५० हजार जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदी उपस्थित होते. वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रीप्टही यावेळी ‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केली. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी प्रस्तावना करुन वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले. तर सहायक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले.

असे झाले बक्षीस वितरण

वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत आयोजिलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम राज सावंत (अंबरनाथ), द्वीतीय अलिफिया अन्सारी (श्रीरंग, ठाणे) आणि तृतीय वेदांत कोचरे (श्री माँ बालनिकेतन) तर रिल्स स्पर्धेत श्रेयस पांचाळ, विवेक यादव आणि ऋषिकेश पाटील हे विजेते ठरले. त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये रोहित मालेकर, आर्या अंबुरे आणि रंजन किणी यांनी बक्षीस मिळवले.

टॅग्स :thaneठाणे