शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

डोंबिवलीकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळे!

By admin | Updated: February 14, 2016 03:05 IST

कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता. शिवसेना-भाजपाच्या भूलथापांना बळी पडायला नको होते. आता या दोन्ही शहरांतील नागरिकांना आपल्या कर्माची फळे भोगण्याशिवाय पर्याय नाही, अशी कडवट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.मनसेच्या शहरातील मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते येथे आले होते. फडके क्रॉस रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी त्यांनी केला. त्या वेळी त्यांना प्रसिद्धिमाध्यमांनी पाणीबाणीबाबत छेडले असता, त्यांनी ही तिखट आणि तिरकस प्रतिक्रिया दिली. त्या वेळच्या प्रचारादरम्यान आम्ही या दोन्ही पक्षांविषयी सांगत होतो. पण, मतदारांनी तेव्हा विचार केला नाही, त्यामुळे आता त्याचा त्रास होणारच, असे सांगत त्यांनी या प्रश्नांची जबाबदारी पालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपावर ढकलली. या वेळी शहराध्यक्ष मनोज घरत, उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, पक्षाचे सर्व नगरसेवक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. चाफेकर यांचाही गौरव सह्यांच्या संग्रहाचे रेकॉर्ड केल्यामुळे लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतीश चाफेकर यांचा समावेश झाला आहे. त्यांच्यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल, चाफेकर यांचाही सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.