शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

डोंबिवलीकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळे!

By admin | Updated: February 14, 2016 03:05 IST

कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता. शिवसेना-भाजपाच्या भूलथापांना बळी पडायला नको होते. आता या दोन्ही शहरांतील नागरिकांना आपल्या कर्माची फळे भोगण्याशिवाय पर्याय नाही, अशी कडवट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.मनसेच्या शहरातील मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते येथे आले होते. फडके क्रॉस रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी त्यांनी केला. त्या वेळी त्यांना प्रसिद्धिमाध्यमांनी पाणीबाणीबाबत छेडले असता, त्यांनी ही तिखट आणि तिरकस प्रतिक्रिया दिली. त्या वेळच्या प्रचारादरम्यान आम्ही या दोन्ही पक्षांविषयी सांगत होतो. पण, मतदारांनी तेव्हा विचार केला नाही, त्यामुळे आता त्याचा त्रास होणारच, असे सांगत त्यांनी या प्रश्नांची जबाबदारी पालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपावर ढकलली. या वेळी शहराध्यक्ष मनोज घरत, उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, पक्षाचे सर्व नगरसेवक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. चाफेकर यांचाही गौरव सह्यांच्या संग्रहाचे रेकॉर्ड केल्यामुळे लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतीश चाफेकर यांचा समावेश झाला आहे. त्यांच्यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल, चाफेकर यांचाही सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.