शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळे!

By admin | Updated: February 14, 2016 03:05 IST

कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता. शिवसेना-भाजपाच्या भूलथापांना बळी पडायला नको होते. आता या दोन्ही शहरांतील नागरिकांना आपल्या कर्माची फळे भोगण्याशिवाय पर्याय नाही, अशी कडवट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.मनसेच्या शहरातील मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते येथे आले होते. फडके क्रॉस रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी त्यांनी केला. त्या वेळी त्यांना प्रसिद्धिमाध्यमांनी पाणीबाणीबाबत छेडले असता, त्यांनी ही तिखट आणि तिरकस प्रतिक्रिया दिली. त्या वेळच्या प्रचारादरम्यान आम्ही या दोन्ही पक्षांविषयी सांगत होतो. पण, मतदारांनी तेव्हा विचार केला नाही, त्यामुळे आता त्याचा त्रास होणारच, असे सांगत त्यांनी या प्रश्नांची जबाबदारी पालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपावर ढकलली. या वेळी शहराध्यक्ष मनोज घरत, उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, पक्षाचे सर्व नगरसेवक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. चाफेकर यांचाही गौरव सह्यांच्या संग्रहाचे रेकॉर्ड केल्यामुळे लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतीश चाफेकर यांचा समावेश झाला आहे. त्यांच्यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल, चाफेकर यांचाही सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.