शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

डोंबिवलीत पाण्याच्या मीटरची राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:10 IST

घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

डोंबिवली : घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिनाभरात ५० ते ६० मीटर चोरीला गेल्याची नोंद महापालिका दफ्तरी करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी तक्रारअर्ज देऊनही मीटरचोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुख्य म्हणजे पोलीस एफआयआर दाखल करून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नवीन मीटरच्या खर्चाचा भुर्दंड आणि मीटर नसल्याने जादा बिले येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ या प्रमुख ठिकाणांसह बहुतांश ठिकाणच्या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. पश्चिमेतही या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सहा महिन्यांत २५३ पाणीमीटर चोरीला गेली आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

राजाजी पथावरील नंदादीप, शिवम कॉम्प्लेक्स, स्मृती जनार्दन, सुरज, आर्यभट्ट, दिनकर, कांचन, मल्हार या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. राजाजी पथ परिसरात २० एप्रिलच्या मध्यरात्री ३० ते ४० मीटर चोरीला गेल्याची माहिती दिनकर बिल्डिंगमधील रहिवासी हेमंत ताम्हणे यांनी दिली. या वाढत्या घटना पाहता या चोरीच्या घटनांमागे एखादे रॅकेट तर नाही ना, अशी शंका स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या ‘ग’ प्रभागात एप्रिलमध्ये २९ मीटर, तर ‘फ’ प्रभागात चार मीटर चोरीला गेल्याचे अर्ज आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. डोंबिवलीत चोरीच्या घटना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्याप या मीटरचोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. महापालिकेने त्या सोसायट्यांमध्ये नव्याने मीटरही बसवलेले नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता मीटर चोरीला गेल्याने नवीन मीटर बसवण्याबाबत संबंधितांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. मीटर चोरीला गेल्याने सध्या पाण्याचे मोजमाप होत नसले, तरी त्यांना भरमसाट बिले पाठवली जाणार नाहीत. नवीन मीटर लावल्यानंतरच मोजमाप होईल, असा दावा त्या विभागाकडून करण्यात आला आहे.एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळमीटर चोरीला गेल्याने संबंधित सोसायट्यांमधील सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. त्यामुळे केडीएमसीकडून भरमसाट पाण्याची बिले आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजाजी पथावरील नंदादीप सोसायटीतील रहिवासी संदीप पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर तक्रार अर्ज घेताना पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.