शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

डोंबिवलीत पाण्याच्या मीटरची राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:10 IST

घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

डोंबिवली : घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिनाभरात ५० ते ६० मीटर चोरीला गेल्याची नोंद महापालिका दफ्तरी करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी तक्रारअर्ज देऊनही मीटरचोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुख्य म्हणजे पोलीस एफआयआर दाखल करून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नवीन मीटरच्या खर्चाचा भुर्दंड आणि मीटर नसल्याने जादा बिले येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ या प्रमुख ठिकाणांसह बहुतांश ठिकाणच्या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. पश्चिमेतही या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सहा महिन्यांत २५३ पाणीमीटर चोरीला गेली आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

राजाजी पथावरील नंदादीप, शिवम कॉम्प्लेक्स, स्मृती जनार्दन, सुरज, आर्यभट्ट, दिनकर, कांचन, मल्हार या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. राजाजी पथ परिसरात २० एप्रिलच्या मध्यरात्री ३० ते ४० मीटर चोरीला गेल्याची माहिती दिनकर बिल्डिंगमधील रहिवासी हेमंत ताम्हणे यांनी दिली. या वाढत्या घटना पाहता या चोरीच्या घटनांमागे एखादे रॅकेट तर नाही ना, अशी शंका स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या ‘ग’ प्रभागात एप्रिलमध्ये २९ मीटर, तर ‘फ’ प्रभागात चार मीटर चोरीला गेल्याचे अर्ज आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. डोंबिवलीत चोरीच्या घटना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्याप या मीटरचोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. महापालिकेने त्या सोसायट्यांमध्ये नव्याने मीटरही बसवलेले नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता मीटर चोरीला गेल्याने नवीन मीटर बसवण्याबाबत संबंधितांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. मीटर चोरीला गेल्याने सध्या पाण्याचे मोजमाप होत नसले, तरी त्यांना भरमसाट बिले पाठवली जाणार नाहीत. नवीन मीटर लावल्यानंतरच मोजमाप होईल, असा दावा त्या विभागाकडून करण्यात आला आहे.एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळमीटर चोरीला गेल्याने संबंधित सोसायट्यांमधील सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. त्यामुळे केडीएमसीकडून भरमसाट पाण्याची बिले आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजाजी पथावरील नंदादीप सोसायटीतील रहिवासी संदीप पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर तक्रार अर्ज घेताना पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.