शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

डोंबिवलीत पाण्याच्या मीटरची राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:10 IST

घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

डोंबिवली : घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिनाभरात ५० ते ६० मीटर चोरीला गेल्याची नोंद महापालिका दफ्तरी करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी तक्रारअर्ज देऊनही मीटरचोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुख्य म्हणजे पोलीस एफआयआर दाखल करून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नवीन मीटरच्या खर्चाचा भुर्दंड आणि मीटर नसल्याने जादा बिले येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ या प्रमुख ठिकाणांसह बहुतांश ठिकाणच्या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. पश्चिमेतही या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सहा महिन्यांत २५३ पाणीमीटर चोरीला गेली आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

राजाजी पथावरील नंदादीप, शिवम कॉम्प्लेक्स, स्मृती जनार्दन, सुरज, आर्यभट्ट, दिनकर, कांचन, मल्हार या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. राजाजी पथ परिसरात २० एप्रिलच्या मध्यरात्री ३० ते ४० मीटर चोरीला गेल्याची माहिती दिनकर बिल्डिंगमधील रहिवासी हेमंत ताम्हणे यांनी दिली. या वाढत्या घटना पाहता या चोरीच्या घटनांमागे एखादे रॅकेट तर नाही ना, अशी शंका स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या ‘ग’ प्रभागात एप्रिलमध्ये २९ मीटर, तर ‘फ’ प्रभागात चार मीटर चोरीला गेल्याचे अर्ज आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. डोंबिवलीत चोरीच्या घटना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्याप या मीटरचोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. महापालिकेने त्या सोसायट्यांमध्ये नव्याने मीटरही बसवलेले नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता मीटर चोरीला गेल्याने नवीन मीटर बसवण्याबाबत संबंधितांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. मीटर चोरीला गेल्याने सध्या पाण्याचे मोजमाप होत नसले, तरी त्यांना भरमसाट बिले पाठवली जाणार नाहीत. नवीन मीटर लावल्यानंतरच मोजमाप होईल, असा दावा त्या विभागाकडून करण्यात आला आहे.एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळमीटर चोरीला गेल्याने संबंधित सोसायट्यांमधील सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. त्यामुळे केडीएमसीकडून भरमसाट पाण्याची बिले आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजाजी पथावरील नंदादीप सोसायटीतील रहिवासी संदीप पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर तक्रार अर्ज घेताना पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.