शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

डोंबिवली-ठाकुर्लीत ‘जंगलराज’

By admin | Updated: May 11, 2017 02:02 IST

ठाकुर्ली पूर्व, बालाजीनगर या नव्याने विकसित होत असलेल्या परिसरात नवीन इमारतीचे व घरातील इंटिरिअरचे काम करायचे असेल

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ठाकुर्ली पूर्व, बालाजीनगर या नव्याने विकसित होत असलेल्या परिसरात नवीन इमारतीचे व घरातील इंटिरिअरचे काम करायचे असेल, तर दिलीप व शंकर भोईर या गुंडांनाच हे काम मिळाले पाहिजे, अशी भोईर कुटुंबांची भाईगिरी या भागात सुरू होती. मात्र, भोईर कंपनीच्या दारूच्या पार्ट्या झोडून आणि मटण-वड्यांवर ताव मारून मस्तवाल झालेल्या पोलिसांनी सातत्याने केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने किशोर चौधरी यांचा नियोजनबद्ध, निर्घृण खून झाला, अशी टीका या परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांच्या कार्यकाळात गुंडगिरी वाढल्याने त्यांची बदली करण्याची मागणी आता शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊ चौधरी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली. मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणावर वरचष्मा असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना भोईर कंपनीच्या गुंडगिरीची कल्पना नव्हती, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. उलटपक्षी असे अनेक लोकल माफिया अन्य पक्षांइतकेच किंबहुना अधिक शिवसेना वर्षानुवर्षे पोसत आली आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.बालाजीनगरात बाहेरील व्यक्तीने येऊन कुठलेही छोटेमोठे काम केले, तर त्याला भोईर कुटुंबातील गुंड मारहाण करत होते. भोईर यांच्या दहशतीविरुद्ध कुणाकडून तक्रार आली नव्हती. मात्र, देवी शिवामृत बिल्डिंगमधील रहिवाशांनी तक्रार केली होती, अशी निलाजरी सारवासारव विजयसिंह पवार यांनी केली आहे. आता तर थेट गोळ्या घालून त्यांनी चौधरींना ठार मारल्याने बालाजीनगरातील या गुंडांची दहशत कित्येक पटीने वाढली आहे. भविष्यात या भोईर कंपनीच्या गुंडांना अटक होईल, ते जामिनावर सुटतील आणि चौधरी यांच्या हत्येच्या भांडवलावर टगेगिरी करत बालाजीनगरात दहशत पसरवत फिरतील, असे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही म्हणणे आहे. कल्याण, डोंबिवली व ठाकुर्ली शहरांत मोठ्या प्रमाणात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. ज्या परिसरात हा विकास होत आहे, त्या प्रत्येक परिसरात भोईर याच्यासारखेच गुंड, दादा अथवा भाई यांची दहशत आहे. या गुंडांनी आपले परिसर वाटून घेतले असून कुणी सीमोल्लंघन केले तर हाणामाऱ्या करणे, खूनबाजी करणे, हे त्यांचे उद्योग आहेत. विशिष्ट परिसरातील रेती-खडीपुरवठा करण्यापासून घराघरांतील केबल नेटवर्कपर्यंत आर्थिक नाड्या आपल्याच ताब्यात असल्या पाहिजे, असा या गुंडांचा खाक्या आहे. साधनशुचितेच्या बाता मारणारी भाजपा, मराठी माणसाच्या नावाने गळे काढणारी शिवसेना- मनसे, स्वाभिमानाच्या गप्पा करणारी राष्ट्रवादी या साऱ्यांनी हे गुंड वाटून घेतले आहेत. ते आज शिवसेनेत, तर उद्या भाजपात किंवा आज मनसेत, तर परवा राष्ट्रवादीत जातात. पालिका निवडणुकीत हेच गुंड आपली मुलेबाळे, सुना, भाऊ, जावई यांना उभे करून निवडून आणतात आणि स्थानिक राजकारणावरील व आर्थिक साम्राज्यावरील पकड घट्ट करतात. रस्त्यात कुठेही मोटारी उभ्या करून निघून जायचे, रात्रीअपरात्री कर्णकर्कश हॉर्न वाजवत मोटारी चालवायचे, दारू पिऊन हॉकीस्टीक-चॉपर घेऊन राडे करायचे, हेच उद्योग हे लोकल माफिया व त्यांनी पोसलेले बगलबच्चे करत असतात. या लोकल माफियांच्या दररोज रात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्ये पोलीस, पालिका अधिकारी हजेरी लावत असल्याने लग्नाच्या हळदीत रात्री मोठ्याने लाऊडस्पीकर लावून यांनी धांगडधिंगा केला किंवा ट्रॅफिकमध्ये यांच्या एसयूव्ही गाड्यांवर अन्य वाहनचालकांकडून ओरखडा उठल्याने यांनी एखाद्याला बुकलले, तरी पोलीस त्याची दखलही घेत नाहीत.