शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

डोंबिवलीत रिक्षा महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:52 IST

आरटीओ, रिक्षा संघटनांची बैठक : उद्या होणार संयुक्त पाहणी; किमान २ रुपये वाढ?

डोंबिवली : पश्चिमेतील सुभाष रोड आणि परिसरात शेअर पद्धतीने धावणाऱ्या रिक्षाचालकांनी काही दिवसांपासून प्रवाशांकडून प्रतिसीट आठ रुपयांऐवजी दहा रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, ही भाडेवाढ बेकायदा असल्याने प्रवाशांनी वाढीव भाडे द्यावे की नाही, यासाठी कल्याण आरटीओ कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. या वेळी २०१४ पासून कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ द्यावी, अशी मागणी या वेळी रिक्षा संघटनांनी केली.दरम्यान, भाडेवाढ अटळ असल्याचे संकेत आरटीओ अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये डोंबिवलीत रिक्षा प्रवास महागणार आहे.पश्चिमेतील सुभाष रोड परिसरातून कुंभारखाण पाडा, चिंचोड्याचा पाडा आदी भागात जाण्यासाठी आठ रुपये शेअर पद्धतीने घेतले जात होते, पण काही रिक्षाचालकांनी अचानकपणे १० रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे नेमके किती भाडे द्यायचे, या वरून रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात संघर्ष सुरू होता. कल्याण आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी त्याची दखल घेत मंगळवारी बैठक बोलावली होती. यावेळी कल्याण-डोंबिवली परिसरातील रिक्षा संघटनांचे प्रकाश पेणकर, शेखर जोशी, काळू कोमास्कर, दत्ता माळेकर, अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे, रामा काकडे, संजय मांजरेकर, संतोष नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.पेणकर यांनी कल्याण परिसरातील रिक्षाचालकांची व्यथा मांडली. हकीम समितीने दरवर्षी किमान एक रुपया भाडेवाढ करावी, अशी शिफारस केली होती; पण डोंबिवली शहर परिसरात २०१४ पासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ द्यावी, आणि ती नियमानुसार द्यावी, जेणेकरून प्रवाशांच्या रोषाला रिक्षाचालकांना सामोरे जावे लागणार नाही. त्यासाठी आरटीओनेच दरपत्रक ठिकठिकाणी लावावे आणि दर जाहीर करावेत, अशी मागणी पेणकर यांनी यावेळी केली.दरवाढ जरी रिक्षाचालकांनी केलेली नसली तरीही चौथी सीट भरून ते भाडेवसूल केले जात असल्याचाही मुद्दा बैठकीदरम्यान चर्चेत आला होता. त्यावर मात्र संघटनांच्या पदाधिकाºयांनी आळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारत बोलणे टाळले. त्या सोबतच जर डोंबिवलीहून काटईला जाण्यासाठी जर ४० रुपये घेणे अपेक्षित असले तरी आता केवळ २५ रुपयेच आकारण्यात येत असल्याची बाब माळेकर यांनी ससाणे यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यानुसार आरटीओ अधिकारी, रिक्षा आणि प्रवासी संघटनांचे पदाधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा गुरुवारी करण्यात येणार असल्याची माहिती ससाणे यांनी दिली. त्या पाहणीनंतर किती दरवाढ द्यायची? कोणत्या मार्गावर द्यायची, कुठे नाही यासंदर्भात देखिल चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ती पाहणी केल्यावर ठाण्याच्या वरिष्ठांकडे तसेच एमएमआरटीएकडे संघटनांच्या दरवाढीसह अन्य मागण्यांचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.कल्याणमधील खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रिक्षाचालक त्रस्त असून त्यांनी गर्दीच्या वेळेत चार तास रिक्षा न चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर झालेल्या चर्चेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त गोविंद बोडके आदी हजर होते.भाडेवाढ करू नका- चव्हाणराज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी ससाणे यांच्याशी भाडेवाढ न करण्यासंदर्भात चर्चा केली होती. शहरातील बहुतांश रिक्षा सीएनजी चालत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसारखा खर्च रिक्षाचालकांना होत नसल्याचे, ते म्हणाले होते.रिक्षाचालकांसह संघटनांची मागणी रास्त असली तरीही प्रवाशांच्या हिताचा विचार करावा आणि शक्यतोवर भाडेवाढ करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तसेच यासंदर्भात रिक्षासंघटनांशी चर्चा करून योग्य तो पर्याय काढण्यासंदर्भात तयारी दर्शवल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा