शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

डोंबिवली-पुणे बस आजपासून पुन्हा

By admin | Updated: June 13, 2017 03:23 IST

प्रवासी पुरेसे नसल्याने कारण पुढे करत एसटी महामंडळाने रविवारपासून बंद केलेली डोंबिवली-स्वारगेट बस मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बस परस्पर

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : प्रवासी पुरेसे नसल्याने कारण पुढे करत एसटी महामंडळाने रविवारपासून बंद केलेली डोंबिवली-स्वारगेट बस मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बस परस्पर बंद करण्याच्या एसटीच्या मनमानी कारभाराची गंभीर दखल घेत मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी ठाण्याला जाऊन ती पुन्हा सुरु करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. ही मंगळवारपासून सुरु करण्याचे तोंडी आश्वासन जिल्हा नियंत्रक अविनाथ पाटील यांनी दिल्याची माहिती घरत यांनी दिली.प्रवाशांच्या मागणीची दखल घेत एसटीने डोंबिवली-पुणे मार्गावर बस सुरू केली. पण खाजगी बसेस आरामदायी, एसी असताना एसटीने लाल डबा सुरू केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी ही बस सुरू करत असल्याची जागृती केली, पण एसटीने त्याबाबत काहीही केले नाही आणि संधी मिळताच प्रवाशांना अंधारात ठेवत बस बंद केल्याचा आरोप, प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी केला. डोंबिवलीतून पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसना प्रवासी मिळतात, मग एसटीलाच प्रवासी का मिळत नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामंडळाने मुंबई-रत्नागिरी ही वातानुकूलीत शिवशाही बस दोन दिवसांपूर्वी सुरु केली. तशीच बस डोंबिवली-पुणे मार्गावर सुुरु का केली नाही, असा मुद्दा घरत यांनी उपस्थित केला. त्यावर पाटील यांनी त्यासाठी महामंडळाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. महामंडळाच्या परवानगीनंतरच वातानुकूलित बस सुरु करता येऊ शकते, असे कारण दिले. त्यामुळे आता महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाला भेट देऊन निवेदन देणार असल्याचे घरत यांनी सांगितले. कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता डोंबिवली-पुणे बस बंद केल्याच्या निर्णयावर टीका केली. याचा जाब त्यांनी विठ्ठलवाडी बस डेपोचे व्यवस्थापक माणिक जुंबळे यांना विचारला. डोंबिवली-पुणे बससाठी तिकीट आरक्षण करुन जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण चांगले होते. कल्याण व डोंबिवली अशा दोन्ही ठिकाणांहून आरक्षण केले जात होते. परतीच्या प्रवासासाठी ९० टक्के प्रवासी मिळत होते. उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किमान १५ इतकी होती. असे असूनही प्रशासनाने मनमानी कारभार केला. बारमाही बसलाही ठेंगा प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने २३ मार्गांवरील बस बंद केल्या. या गाड्या हंगामी (सिझनल) होत्या, असा दावाही प्रशासनाने केला. २३ मार्गांवरील बस बंद; नियमावर बोट ठेवून निर्णयमहामंडळाच्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठाणे एक व दोन असे दोन डेपो आहेत. याशिवाय कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा असे सहा डेपो गृहीत धरता एकूण आठ डेपो जिल्ह्यात आहेत. महामंडळाच्या मुख्यालयाने ६० टक्के प्रवाशांची अट घातली आहे. त्यावर बोट ठेवून अनेक बस बंद केल्या जातात. बोरिवली-पाचोरा, ठाणे-सातारा, ठाणे-मुरुड, ठाणे-महाड, शहापूर-चाळीसगाव, शहापूर-धुळे, कल्याण-बामनोली, कल्याण-सुपे, भिवंडी-कोल्हापूर, भिवंडी-पोलादपूर, कल्याण-अवसरी, कल्याण-जांबूत, ठाणे-शिंदी, ठाणे-आंबवणे, ठाणे-अंबेजोगाई, विठ्ठलवाडी-शिवाजीनगर, विठ्ठलवाडी-डिंबा, वाडा-अक्कलकुवा, वाडा-अंबेजोगाई आणि भिवंडी-नगर मार्गावरील चार बस गाड्या अशा २३ बस अशीच कारणे देत बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय १६ जूनपासून विठ्ठलवाडी-गराटेवाडी ही बस सेवा बंद करण्यात येणार असल्याचे डेपोकडून जाहीर करण्यात आले आहे.