शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

डोंबिवली-पुणे बस आजपासून पुन्हा

By admin | Updated: June 13, 2017 03:23 IST

प्रवासी पुरेसे नसल्याने कारण पुढे करत एसटी महामंडळाने रविवारपासून बंद केलेली डोंबिवली-स्वारगेट बस मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बस परस्पर

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : प्रवासी पुरेसे नसल्याने कारण पुढे करत एसटी महामंडळाने रविवारपासून बंद केलेली डोंबिवली-स्वारगेट बस मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बस परस्पर बंद करण्याच्या एसटीच्या मनमानी कारभाराची गंभीर दखल घेत मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी ठाण्याला जाऊन ती पुन्हा सुरु करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. ही मंगळवारपासून सुरु करण्याचे तोंडी आश्वासन जिल्हा नियंत्रक अविनाथ पाटील यांनी दिल्याची माहिती घरत यांनी दिली.प्रवाशांच्या मागणीची दखल घेत एसटीने डोंबिवली-पुणे मार्गावर बस सुरू केली. पण खाजगी बसेस आरामदायी, एसी असताना एसटीने लाल डबा सुरू केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी ही बस सुरू करत असल्याची जागृती केली, पण एसटीने त्याबाबत काहीही केले नाही आणि संधी मिळताच प्रवाशांना अंधारात ठेवत बस बंद केल्याचा आरोप, प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी केला. डोंबिवलीतून पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसना प्रवासी मिळतात, मग एसटीलाच प्रवासी का मिळत नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामंडळाने मुंबई-रत्नागिरी ही वातानुकूलीत शिवशाही बस दोन दिवसांपूर्वी सुरु केली. तशीच बस डोंबिवली-पुणे मार्गावर सुुरु का केली नाही, असा मुद्दा घरत यांनी उपस्थित केला. त्यावर पाटील यांनी त्यासाठी महामंडळाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. महामंडळाच्या परवानगीनंतरच वातानुकूलित बस सुरु करता येऊ शकते, असे कारण दिले. त्यामुळे आता महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाला भेट देऊन निवेदन देणार असल्याचे घरत यांनी सांगितले. कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता डोंबिवली-पुणे बस बंद केल्याच्या निर्णयावर टीका केली. याचा जाब त्यांनी विठ्ठलवाडी बस डेपोचे व्यवस्थापक माणिक जुंबळे यांना विचारला. डोंबिवली-पुणे बससाठी तिकीट आरक्षण करुन जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण चांगले होते. कल्याण व डोंबिवली अशा दोन्ही ठिकाणांहून आरक्षण केले जात होते. परतीच्या प्रवासासाठी ९० टक्के प्रवासी मिळत होते. उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किमान १५ इतकी होती. असे असूनही प्रशासनाने मनमानी कारभार केला. बारमाही बसलाही ठेंगा प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने २३ मार्गांवरील बस बंद केल्या. या गाड्या हंगामी (सिझनल) होत्या, असा दावाही प्रशासनाने केला. २३ मार्गांवरील बस बंद; नियमावर बोट ठेवून निर्णयमहामंडळाच्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठाणे एक व दोन असे दोन डेपो आहेत. याशिवाय कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा असे सहा डेपो गृहीत धरता एकूण आठ डेपो जिल्ह्यात आहेत. महामंडळाच्या मुख्यालयाने ६० टक्के प्रवाशांची अट घातली आहे. त्यावर बोट ठेवून अनेक बस बंद केल्या जातात. बोरिवली-पाचोरा, ठाणे-सातारा, ठाणे-मुरुड, ठाणे-महाड, शहापूर-चाळीसगाव, शहापूर-धुळे, कल्याण-बामनोली, कल्याण-सुपे, भिवंडी-कोल्हापूर, भिवंडी-पोलादपूर, कल्याण-अवसरी, कल्याण-जांबूत, ठाणे-शिंदी, ठाणे-आंबवणे, ठाणे-अंबेजोगाई, विठ्ठलवाडी-शिवाजीनगर, विठ्ठलवाडी-डिंबा, वाडा-अक्कलकुवा, वाडा-अंबेजोगाई आणि भिवंडी-नगर मार्गावरील चार बस गाड्या अशा २३ बस अशीच कारणे देत बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय १६ जूनपासून विठ्ठलवाडी-गराटेवाडी ही बस सेवा बंद करण्यात येणार असल्याचे डेपोकडून जाहीर करण्यात आले आहे.