शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शुद्ध हवा येऊ द्या; हिरवा पाऊस पडलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटले होss!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:46 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील प्रदूषणकारी शहरात दुस-या क्रमांकावर असलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटत असल्याची माहिती पुढे आली आहे.

- मुरलीधर भवार डोंबिवली : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील प्रदूषणकारी शहरात दुस-या क्रमांकावर असलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटत असल्याची माहिती पुढे आली आहे. सीएनजी वाहनांची वाढलेली संख्या, हरीत लवादाने रासायनिक कारखान्यांवर आलेले निर्बंध यासारख्या प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.२००९ साली प्रदूषणाचा इंडेक्स ७८.४१ टक्के होता. तो २०१६ साली ५० टक्यांवर आला आहे. सध्याचा आकडा समाधानकारक नसला, तरी तो आणखी घटावा, यासाठी विविध यंत्रणा प्रयत्न करत आहेत. कॉन्प्रिहेन्सिव्ह इन्व्हायर्नमेंट पोल्यूशन इंकेक्स (सीईपीई) २००९ साली ७८.४१ टक्के इतका होता. २०१३ ला त्यात वाढ झाली. प्रदूषण वाढल्याने तो ८९.९० टक्के झाला. २०१६ साली मात्र तो ५० टक्क्यांवर आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.२००९ साली डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न बराच गाजला. डोंबिवली प्रदूषणाच्या फास्ट ट्रॅकवर होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, डोंबिवलीतील प्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. पुन्हा २०१० सालीही प्रदूषित शहरांच्या यादीतील डोंबिवलीचा क्रमांक कायम होता. औद्योगिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न तीव्र बनला. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या अपग्रेडेशनवर आतापर्यंत जवळपास पाच कोटी खर्च करण्यात आले. टेक्सटाईल इंडस्ट्रिजच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या अपग्रेडेशनवर हा खर्च करण्यात आला. डोंबिवली फेज दोनमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्यात आले होते. या प्रक्रिया केंद्रात यापूर्वी बायो टॉवरच्या माध्यमातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात होती. तेथे २५ टक्के सांडपाण्यावर प्रक्रियेस मुभा दिली गेली. तेथे बायो रिअ‍ॅक्टरचा वापर करुन सांडपाणी प्रक्रिया सुरू झाली. रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्या होत्या. त्यांची दुरुस्ती करण्यात आली. फुटलेले चेंबर व्यवस्थित केले. काही कारखान्यांनी स्वत:च्या सांडपाण्यावर प्रक्रियेची यंत्रणा उभारली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची गस्त वाढली. तक्रारीची दखल घेऊन त्याच्या निवारणासाठी घटनास्थळी धाव घेतली जाऊ लागली. त्याचबरोबर पिंपळेश्वर येथे प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडी, बारावे आणि चिंचपाडा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली. त्यामुळेही प्रदूषणाची मात्रा कमी होण्यास मदत झाली असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला.>सीएनजीचा परिणाम२००९ साली कल्याण-भिवंडी रोडवर कोन गावाजवळ आणि शीळ येथे सीएनजी पंप होता. त्यातही आता वाढ झाली आहे.शीळ रोड, मानपाडा पोलीस स्टेशनजवळ, अंबरनाथ पश्चिमेला पोलीस स्टेशनजवळ, विम्को नाका, फॉरेस्टनाका, उल्हासनगरात कॅम्प नंबर चार येथे सीएनजी पंप सुरु झाले आहेत.कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा १०० टक्के सीएनजीवर परावर्तीत झाल्याने वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.>अमृत योजनेंतर्गत निधी : कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाठपुरावा सुरु आहे. सरकारने त्याची दखल घेत अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रक्रियेसाठी विविध महापालिकांना निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महापालिका सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका