शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:38 IST

समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली या शहरांची संस्कृती भिन्न आहे. वाढत्या नागरिकीक रणामुळे मूलभूत सुविधांचा सध्या पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता डोंबिवलीची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी मान्यवरांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. शनिवारी येथील ब्राह्मण सभागृहात चव्हाण यांनी शहरातील सामाजिक संस्था, मान्यवर यांची विशेष बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शहरातील समस्यांकडे लक्ष वेधताना ही मागणी करण्यात आली.

चव्हाण यांनी नगरसेवक ते आमदार या आतापर्यंतच्या कारकिर्दीत शहरात कोणकोणते उपक्रम राबवले तसेच भविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच उपस्थितांच्या सूचना आणि मार्गदर्शनासाठी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, दीपक मेजारी, स्नेहल दीक्षित, दर्शना सामंत, माधव जोशी, विवेक पंडित आदी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी शहरात भेडसावणाºया समस्या मांडताना ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला. यावेळी नगरसेवकांच्या प्रभागातील कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यांना जे चांगले वाटते तेच करतात, पण नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. नागरिकच सेवक झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली, तर श्रेयवादाचा मुद्दाही यावेळी मान्यवरांकडून मांडण्यात आला. सावित्रीबाई फुले कलामंदिर लवकर सुरू व्हावे, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, लोकसभेला डोंबिवलीतून मतदान कमी झाले. येथून भरभरून मतदान झाले पाहिजे. मतदारयादीत नाव आहे की नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

‘समस्यांचे लवकरच निराकरण होईल’शहरात पहिले नागरिकीकरण झाले, मग पायाभूत सुविधांचा विचार केला गेला. सध्या कल्याण-शीळ मार्गावरील प्रस्तावित पलावा, पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जोशी हायस्कूल येथील उड्डाणपूल, ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर एलिव्हेटेड स्वरू पात उतरवला जाणार आहे. मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. रिंगरूटच्या कामाला गती येणार आहे. दुर्गाडीच्या कामातही सरकारने विशेष लक्ष वेधले आहे. त्यामुळे लवकरच शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, असा दावा चव्हाण यांनी केला. रेल्वेतील सरकते जिने तसेच फलाटांची उंची वाढवणे, ही कामे माझ्याच पुढाकाराने झाली. नागरी सुविधा, आरोग्य सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये प्रस्तावित ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील ५० हजार मुलांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहराबाबत नेहमीच सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. डोंबिवली शहर हे चांगले आहे, असेच म्हटले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना विसरबालभवनच्या शुभारंभप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी येथे तारांगण उभारण्याचे आश्वासन दिले होते. तर, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना शहराची लोकसंख्या चार लाखांच्यावर गेल्यावर डोंबिवलीची महापालिका होऊ शकेल, असे सांगितले होते. पण, त्याचा विसर पडल्याचा मुद्दाही मान्यवरांनी मांडला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका