शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

डोंबिवली-माणकोली-कल्याण बोटसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:13 IST

कल्याण-डोंबिवलीला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीकिनाऱ्याचा लाभ जलवाहतुकीसाठी व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीकिनाऱ्याचा लाभ जलवाहतुकीसाठी व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची त्यासाठी मोलाची साथ असल्याने या मार्गाचा जलदगतीने विकास होणार आहे, असे मत महापौर विनीता राणे यांनी शनिवारी व्यक्त केले.पश्चिमेतील जुन्या डोंबिवली परिसरातून माणकोली-कल्याण-डोंबिवलीदरम्यानच्या खासगी बोटफेरीचा शुभारंभ राणे यांनी शनिवारी केला. याप्रसंगी सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक विश्वनाथ राणे, नगरसेविका दीपाली पाटील, संगीता पाटील, माजी नगरसेवक पंढरी पाटील, बोटमालक विलास ठाकूर आदी उपस्थित होते.डोंबिवली- माणकोली-कल्याण- डोंबिवली या मार्गावरील खाजगी बोटसेवेला २५ मेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्याची खातरजमा झाल्यावरच महापौरांनी या बोटसेवेचा शुभारंभ केला. लहान मुलांसाठी २५ तर मोठ्यांसाठी ५० रुपये, असे भाडे प्रतिप्रवासासाठी आकारले जाणार आहे.डोंबिवली-माणकोलीसाठी सुमारे १० मिनिटे, तर कल्याणसाठी २० मिनिटे लागतील. येत्या काळात मुंब्रा भागातही ही प्रवासी फेरीबोट नेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात आधीही एक बोट कार्यरत आहे. आता ही दुसरी फेरीबोट प्रवाशांसाठी दाखल झाली आहे. एका बोटीतून एका वेळी २० ते २५ प्रवासी प्रवास करू शकतील.याच मार्गावरून ठाणेमार्गे वसई आणि नवी मुंबई येथे जलवाहतुक सुरू केली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे.सध्या दररोज दीडशेहून अधिक नागरिक या फेरीबोटीचा लाभ घेतात. त्या नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात. त्यांचा वेळ वाचावा, यासाठी अशा योजनांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे, असे या वेळी सांगण्यात आले.