शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

डोंबिवलीतील उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी लागणार आठ महिने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:13 IST

खर्च कोणी करायचा? : महापालिका, रेल्वेची पहिली बैठक निष्फळ, वाहतूककोंडीला सामोरे कसे जायचे हा खरा प्रश्न

डोंबिवली : शहरातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मेपासून वाहतुकीसाठी बंद करावा, असे पत्र मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे महापालिकेची पंचाईत झाली आहे. हा पूल वाहतुकीलाठी बंद केल्यास शहरात उद्भवणाऱ्या वाहतूककोंडीला कसे सामोरे जायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही पूल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या डागडुजीसाठी साधारणपणे आठ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढा मोठा काळ वाहतूकबदलांसह सर्वच नियोजन काटेकोरपणे करावे लागणार आहे. परिणामी, वाहतूक नियंत्रण विभागासमोरही पेच आहे.मध्य रेल्वेच्या अभियंता विभागातील सहायक अभियंता आर.एन. मैत्री, विभागीय अभियंता दीपक पाटील आदींसमवेत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी सपना कोळी, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्यामध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यात या पुलाच्या डागडुजीचा खर्च कोणी उचलावा तसेच त्याचा अंदाजे खर्च किती असेल, यासंदर्भात चर्चा झाली. डागडुजी रेल्वे प्रशासन करणार असून निधीची तयारी महापालिकेने करावी, असेही सुचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत रेल्वेच्या हद्दीतील पुलांची डागडुजी रेल्वेने केली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी रेल्वेला सांगितले. पण, तसे या पुलासंदर्भात करता येणार नाही, असे स्पष्टीकरण रेल्वेने दिले.हा पूल १९७८ मध्ये बांधण्यात आला आहे. तेव्हा महापालिका अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नेमका करार काय झाला होता, त्याची प्रत महापालिकेला मिळावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे. साधारणपणे रेल्वे उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील काम रेल्वे प्रशासन करते. त्यास लागणारे जोडरस्ते आणि वरील रस्त्याचा भाग याची देखभाल, डागडुजी ही स्थानिक स्वराज्य संस्था करते, असा निकष असल्याने नेमका खर्च कोणी करायचा, हे करारपत्र बघून त्यानंतरच स्पष्ट केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, वाहतूक नियोजन करण्यासंदर्भात ठाणे येथील वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त अमित काळे यांना आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिट अहवालासह मध्य रेल्वेचे पत्र पाठवण्यात येणार आहे, असे महापालिकेतील सूत्रांनी यावेळी सांगितले.अनेक प्रश्न अनुत्तरीतच : मुळात उड्डाणपुलाच्या डागडुजीच्या कामाचा खर्च कोणी करायचा, हेच अद्याप ठरलेले नाही. त्यात जबाबदारी जरी निश्चित झाली, तरी त्या कामाचे टेंडर कधी निघणार? त्याला लागणारा अवधी आणि तोंडावर आलेला पावसाळा त्यात काम केले जाणार का? हे प्रश्न अनुत्तरीतच आहे.तसेच रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी.डी. लोलगे यांनी महापालिकेला पत्र दिले असून ते रजेवर असल्याने बैठकीला अनुपस्थित होते, असे सांगण्यात आले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या दोन्ही यंत्रणांच्या बैठकीमधून विशेष काही निष्पन्न झाले नसल्याचे चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.