शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत आवक ३० टक्के घटली

By admin | Updated: June 2, 2017 05:39 IST

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला झळ लागली नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न  बाजार समितीला झळ लागली  नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक रोडावली, तर भाजीपाल्याच्या दरात १० ते १५  टक्के वाढ होण्याची भीती भाजीपालाविक्रेते व्यक्त करीत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटल्याचा दावा करीत गुरुवारपासून १० ते २० रुपयांनी भाज्या महाग झाल्या आहेत. त्याची थेट झळ ग्राहकांच्या खिशाला बसली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी भाजीपाल्याची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे. त्यामुळे उद्यापासून शेतमालाची वाहतूक करण्यास शेतमाल वाहक संघटनांनी असमर्थता दर्शवली आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली. परिणामी, उद्यापासून बाजारातील भाजीपाल्याची आवक ठप्प होण्याची चिन्हे आहेत. आज बाजार समितीत २१० टन भाजीपाला आला होता. कल्याण ग्रामीण परिसरातून २ टन भाजीपाला बाजारात आला होता. उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक तशीही कमीच असते. या काळात दररोज २१० ते २२५ टन भाजीपाला बाजारात येतो. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कांदाबटाटा, लसूण, अन्नधान्य, फुले यांचा समावेश असतो. हा माल नाशिक व नगर, पुणे या भागांतून जास्त प्रमाणात येतो. मुंबई-पुणे, कल्याण-नगर, मुंबई-नाशिक महामार्गावरून भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. आलेला माल हा आजच्या दिवसापुरता मर्यादित होता. मर्यादित मालामुळे आता उद्या काय विकणार, हा घाऊक व किरकोळ भाजीपालाविक्रेत्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे आज न विकला गेलेला भाजीपाला बाजारात उद्यापासून चढ्या दराने विकला जाईल. आज भाव वाढलेला नसला, तरी उद्यापासून तो वाढण्याची शक्यता घोडविंदे यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास नागरिकांना याचा फटका बसेल.शेतकरी संपावर गेल्याने खुल्या किरकोळ बाजारात आज मिरचीचा भाव १२० रुपये होता. सिमला मिरचीचा भाव ४० रुपयांवरून ६० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलोवरून ६० रुपये, गवार ४० रुपयांवरून प्रतिकिलो ६० रुपये, काकडी २० रुपये किलोवरून ४० रुपये, फ्लॉवर ३० रुपयांवरून ४० रुपये, कोथिंबीर जुडी १० रुपयांनाच असली, तरी आकार छोटा झाला आहे. किरकोळ भाजीपाला बाजारात गुरुवारी ३० टक्के माल कमी आला, असा दावा विक्रेत्यांनी केला.