शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

डोंबिवलीत आवक ३० टक्के घटली

By admin | Updated: June 2, 2017 05:39 IST

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला झळ लागली नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न  बाजार समितीला झळ लागली  नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक रोडावली, तर भाजीपाल्याच्या दरात १० ते १५  टक्के वाढ होण्याची भीती भाजीपालाविक्रेते व्यक्त करीत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटल्याचा दावा करीत गुरुवारपासून १० ते २० रुपयांनी भाज्या महाग झाल्या आहेत. त्याची थेट झळ ग्राहकांच्या खिशाला बसली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी भाजीपाल्याची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे. त्यामुळे उद्यापासून शेतमालाची वाहतूक करण्यास शेतमाल वाहक संघटनांनी असमर्थता दर्शवली आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली. परिणामी, उद्यापासून बाजारातील भाजीपाल्याची आवक ठप्प होण्याची चिन्हे आहेत. आज बाजार समितीत २१० टन भाजीपाला आला होता. कल्याण ग्रामीण परिसरातून २ टन भाजीपाला बाजारात आला होता. उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक तशीही कमीच असते. या काळात दररोज २१० ते २२५ टन भाजीपाला बाजारात येतो. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कांदाबटाटा, लसूण, अन्नधान्य, फुले यांचा समावेश असतो. हा माल नाशिक व नगर, पुणे या भागांतून जास्त प्रमाणात येतो. मुंबई-पुणे, कल्याण-नगर, मुंबई-नाशिक महामार्गावरून भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. आलेला माल हा आजच्या दिवसापुरता मर्यादित होता. मर्यादित मालामुळे आता उद्या काय विकणार, हा घाऊक व किरकोळ भाजीपालाविक्रेत्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे आज न विकला गेलेला भाजीपाला बाजारात उद्यापासून चढ्या दराने विकला जाईल. आज भाव वाढलेला नसला, तरी उद्यापासून तो वाढण्याची शक्यता घोडविंदे यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास नागरिकांना याचा फटका बसेल.शेतकरी संपावर गेल्याने खुल्या किरकोळ बाजारात आज मिरचीचा भाव १२० रुपये होता. सिमला मिरचीचा भाव ४० रुपयांवरून ६० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलोवरून ६० रुपये, गवार ४० रुपयांवरून प्रतिकिलो ६० रुपये, काकडी २० रुपये किलोवरून ४० रुपये, फ्लॉवर ३० रुपयांवरून ४० रुपये, कोथिंबीर जुडी १० रुपयांनाच असली, तरी आकार छोटा झाला आहे. किरकोळ भाजीपाला बाजारात गुरुवारी ३० टक्के माल कमी आला, असा दावा विक्रेत्यांनी केला.