शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-अंबरनाथची उद्योगबंदी उठवली!

By admin | Updated: August 11, 2016 04:06 IST

पर्यावरण महत्त्वाचे असले तरी उद्योगही जगले पाहिजेत अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये

मुंबई/कल्याण : पर्यावरण महत्त्वाचे असले तरी उद्योगही जगले पाहिजेत अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये हरीत लवादाने लादलेली उद्योगबंदी बुधवारी उठवली. प्रदूषण होणार नाही, याचे प्रतिज्ञापज्ञ उद्योजकांनी सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले. सांडपाणी प्रक्रियेचे निकष न पाळल्यानेच डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ रासायनिक कारखाने बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्याने गेला दीड महिना कारखाने बंद आहेत. ते सुरू होण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.मात्र यापूर्वीही प्रतिज्ञापत्रे सादर करून उपयोग झालेला नाही. प्रदूषण रोखण्यात नियंत्रण मंडळ कायमच कमी पडले आहे. त्यामुळे आताही त्याचा उपयोग होणार नाही, अशी भूमिका ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने घेतली असून आता उद्योग सुरू झाल्यावर जर प्रदूषण झाले तर ही बंदी उठवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच दोषी ठरवून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. पर्यावरणाचे निकष पाळण्याबरोबरच उद्योग वाचिवणे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एमआयडीसीने सांडपाणी प्रक्रि या केंद्रासंदर्भात आराखडा तयार करून निचऱ्यासाठी दोन वर्षांचे धोरण ठरवावे. तसेच पर्यावरणाच्या निकषावर बंद पडलेल्या डोंबिवली व अंबरनाथ येथील उद्योगांनी, त्यांच्या संघटनांनी पर्यावरणाचे निकष पाळण्याचे प्रतिज्ञापत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करावे, असेही फडणवीस यांनी सांगितले. या बंद उद्योगांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदी उपस्थित होते. . औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राची जबाबदारी एमआयडीसीने घ्यावी. तसेच सांडपाणी निचऱ्याबाबत दोन वर्षाचे नियोजन सादर करावे. त्याची माहिती राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करावी. प्रक्रि या केंद्राच्या पायाभूत सुविधा आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रासंदर्भात अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रकल्प आराखड्याचा अभ्यास करून त्याला मंजुरी द्यावी. उद्योगांनीही वापरलेल्या पाण्यावर प्राथमिक स्वरु पाची प्रक्रि या करणे बंधनकारक आहे. पर्यावरणाचे निकष न पाळणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)