शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डोंबिवलीतही ‘पाणी मुरवा, पाणी पुरवा’

By admin | Updated: May 12, 2016 02:10 IST

एकीकडे वाढणारी काँक्रिटीकरणाची जंगले, रस्त्यांचेही सिमेंटीकरण, पदपथांपासून इमारतींच्या आवारापर्यंत आणि उद्यानांपासून मैदानांपर्यंत सर्वत्र वाढलेला पेव्हरब्लॉकचा वापर

डोंबिवली : एकीकडे वाढणारी काँक्रिटीकरणाची जंगले, रस्त्यांचेही सिमेंटीकरण, पदपथांपासून इमारतींच्या आवारापर्यंत आणि उद्यानांपासून मैदानांपर्यंत सर्वत्र वाढलेला पेव्हरब्लॉकचा वापर यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रियाच शहरात होत नाही. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ती वाढवण्यासाठी भारत विकास परिषदेने डोंबिवलीत १२५ शोषखड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यातून ५० हजार लीटर पाणी जमिनीत मुरवण्याचा परिषदेचा संकल्प आहे. भूजलस्तर वाढवण्यासाठी शोषखड्डे खोदण्याच्या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात झाली. डोंबिवलीतील नेहरू मैदान, शाळांची मैदाने यांची निवड त्यासाठी भारत विकास परिषदेने केली आहे. आतापर्यंत १७ शाळांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय, शहरातील मोकळ्या जागेतही शोषखड्डे खोदले जातील. त्यामुळे या उपक्रमास सोसायट्यांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन परिषदेने केले आहे. पाच फूट खोल, तेवढेच लांब-रुंद खड्डे खोदले जातील. त्यात विटा, रेती, दगडाचे बारीक तुकडे टाकले जातील. त्यानंतर तो खड्डा हलकेच बुजवला जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आपोआप गाळले जाऊन जमिनीत मुरेल, अशी ही व्यवस्था आहे. एका शोषखड्ड्याला पाच हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे एकूण उपक्रमाला जवळपास सात ते आठ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील एक लाख २५ हजारांचा निधी लोकवर्गणीतून परिषदेने जमा केला आहे. उरलेला निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. भारत विकास परिषदेच्या देशभरात १२०० शाखा आहेत. सेवा, संपर्क, संयोग आणि समर्पणाची पंचसूत्री घेऊन गेली ५३ वर्षे परिषदेचे कार्य सुरू आहे. भारत खोज अभियान, पर्यावरण जनजागृती परिषदेमार्फत पार पाडले जाते. डोंबिवलीतही परिषदेची शाखा १७ वर्षे कार्यरत आहे. आमदार रवींद्र चव्हाण, राहुल दामले, परिषदेचे सरचिटणीस विनोद करंदीकर, कोषाध्यक्ष जयंत फाळके, शरद मांडिवले, दीपाली काळे, प्रवीण दुधे आदी पदाधिकारी भूजलस्तर वाढवण्याच्या शुभारंभास हजर होते. अक्षयतृतीयेच्या संकल्पाचा कधीही क्षय होत नाही, या भावनेतून हा दिवस निवडण्यात आला.