शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

डोंबिवलीत व्यापाऱ्यांचा मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवार, रविवारी दुकाने बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवार, रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाविरोधात शनिवारी सकाळपासून डोंबिवलीतील सुमारे ५०० व्यापारी, दुकानदार आणि ज्वेलर्स असोसिएशनने नाराजी व्यक्त करत ‘पालिका आयुक्त हटाव, दुकाने बचाव,’ अशी जोरदार घोषणाबाजी करत मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाबाहेर रस्त्यावर ठिय्या दिला. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.

मनपाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, घाऊक बाजारपेठा शनिवारी सकाळपासून बंद ठेवल्या होत्या. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांनी मनपाच्या विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली. एकीकडे लोकल, बसमध्ये गर्दी वाढत असून त्यावर सरकार कोणतेही निर्बंध लागू करत नाही. मात्र, केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना दर शनिवारी आणि रविवारी सक्तीने दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही दारू विकण्यास परवानगी दिल्याने सरकार आणि मनपा आयुक्त दुजाभाव करत असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला. मात्र, या निर्णयामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे हा आदेश मनपा आयुक्तांनी मागे घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

‘जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करू’, असे व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष दिनेश गोर आणि डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे सेक्रेटरी दिलीप कोठारी यांनी सांगितले. वर्षभरापासून दुकानदारांवर अन्याय होत आहे. त्याकडे कोणीही नीट लक्ष देत नाहीत. मात्र, ऊठसूट दुकाने बंद केली जात आहेत, हा काय प्रकार आहे, असा सवाल गौर यांनी केला. पूर्वेला दर सोमवारी, तर पश्चिमेला बुधवारी दुकाने बंद ठेवायला आम्ही तयार आहोत, पण सरसकट शनिवार, रविवार बंदी हे योग्य नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. ठिय्या आंदोलन करू नका, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले. या आंदोलनाप्रकरणी सायंकाळपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘ रविवारी व्यवसायाला मुभा द्या’

- आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मनपा आयुक्त अथवा उपायुक्त न आल्याने आमदार चव्हाण यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे आणि भारत पाटील यांची भेट घेतली.

- होळीसाठी व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करून माल आणला आहे, त्यासाठी त्यांना रविवारी व्यवसायाची मुभा द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.

- मात्र, त्यानंतर तेथूनच चव्हाण यांनी फोनद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नावर त्यांच्याशी भेटून चर्चेअंती तोडगा काढू या, कायदा सुव्यवस्था व्यापाऱ्यांनी हातात घेऊ नये, असेही आवाहन चव्हाण यांनी केले.

--------------