शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली अडीच तास फेरीवालामुक्त!

By admin | Updated: June 17, 2017 01:35 IST

रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना चालणे अवघड होते. फेरीवाल्यांवर कितीही कारवाई केली तरीही रस्ते

- लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना चालणे अवघड होते. फेरीवाल्यांवर कितीही कारवाई केली तरीही रस्ते मोकळे होत नाहीत. त्यावर तोडगा म्हणून सायंकाळी ६ ते ८.३० या अडीच तासात स्थानक परिसरात फेरीवाले बसणार नाहीत, अशी दक्षता घेण्याचा सुवर्णमध्य केडीएमसीचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी काढला आहे.शहरात पूर्वेला रेल्वेस्थानकाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे कोंडीत भर पडते. रेल्वेच्या पादचारी पुलांवरून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चालणेही कठीण होऊन बसते. फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर आंदोलन छेडण्याची वेळ आली होती. महापौर राजेंद्र देवळकर यांच्यावरही रस्त्यावर उतरण्याची नामुष्की ओढावली होती. तसेच नगरसेवक वामन म्हात्रे यांनीही दर सोमवारी आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करूनही कोणताच परिणाम होत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पूर्णवेळ पथक नेमणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण कुमावत यांनी दिले आहे. ते म्हणाले की, ‘प्रामुख्याने स्थानक परिसरात गर्दी होते. त्यासाठी सायंकाळी फेरीवाल्यांना तेथे व्यवसायास बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे सायंकाळी ६ ते ८.३० च्या दरम्यान तेथे गस्तीपथक नेमले आहे. हे पथक फेरीवाले बसणार नाहीत, याची काळजी घेत आहे.’ ‘अन्य रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करा’पूर्वेला स्थानक परिसराला लागून असलेल्या रामनगर परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवर फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. स्थानकाकडे जाताना डाव्या दिशेला तात्पुरता रिक्षा स्टॅण्ड हलवण्यात आला आहे. त्यामुळे तेथे रिक्षांची रांग तर दुसऱ्या बाजूला फेरीवाले व नागरिकांमुळे मार्ग काढताना वाहनचालकांना त्रास होतो. त्यात अनेकदा केडीएमटीच्या बसही तेथे उभ्या असतात. परिणामी कोंडी आणखीच भर पडते. केळकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वृंदावन हॉटेलबाहेरील स्टॅण्ड तात्पुरता मठासमोर हलवला होता. मात्र, पावसाळ््यामुळे रस्त्याचे काम चार महिने बंद आहे. त्यामुळे स्टॅण्ड पूर्वीच्याच जागी सुरू करा. त्यामुळे स्वामी विवेकानंद रोडवरील कोंडी कमी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.परशुराम कुमावत यांनी केवळ बाजीप्रभू चौक, राथ रोड, एवढेच न बघता उर्सेकरवाडी, स्वामी विवेकानंद रोड आदी ठिकाणच्या फेरीवाल्यांवरही कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.