शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंद

By admin | Updated: July 30, 2016 04:48 IST

रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार

डोंबिवली : रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. प्रक्रियेसाठी टँकरद्वारे सांडपाणी आणण्याचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादापुढे मार्गी न निघाल्याने ही बंदी कायम राहिली आहे. त्यामुळे दीड हजार कोटींचे नुकसान होईल, असा कारखानदारांचा दावा आहे.सांडपाण्यावरील प्रक्रियेबाबत समाधानकारक प्रतिज्ञापत्र सादर करता न आल्याने लवादाने पर्यावरण खात्याच्या केंद्रीय सचिवांना फटकारले आणि सुधारित पत्र सादर करण्याचे आदेश दिले. निकषांची पूर्तता न करता सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवले जात असल्याबद्दल २ जुलैपासून डोंबिवलीतील ८६ आणि अंबरनाथमधील ५६ कारखाने बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागीय कार्यालयाने केली होती. तसेच अंबरनाथ व डोंंबिवली फेज-२ मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याला कारखानदारांनी लवादापुढे आव्हान दिले होते. या स्थगिती अर्जाच्या याचिकेवर २३ आॅगस्टला सुनावणी होणारआहे. कारखानदार आणि डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-२मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. लवादाचा निर्णय होईपर्यंत कारखान्यातील रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तोंडी मान्यता दिली आहे. मात्र, टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेण्यास लेखी मान्यता अद्याप मिळाली नाही. दरम्यान, समाधानकारक प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने पर्यावरण व वन खात्याच्या केंद्रीय सचिवांना लवादाने चांगलेच फटकारले. (प्रतिनिधी)प्रतिज्ञापत्रातील माहिती दिशाभूल करणारी- सध्याच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती मोघम असल्याचे लवादाचे म्हणणे आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या पहिल्या पेजमधील प्रक्रिया केंद्राची प्रक्रिया क्षमता १६ दशलक्ष लीटर असतानाही तेथे फक्त ११ दशलक्ष लीटर सांडपाणी येते. त्यामुळे सर्व निकषांची पूर्तता सहज शक्य असल्याचा दावा त्या प्रतिज्ञापत्रात होता. मात्र, त्या दाव्याला ‘वनशक्ती’ पर्यावरणने आक्षेप घेतला.ज्या काळातील हा दावा आहे, त्या काळात पाणीकपात लागू असल्याने कारखान्यांतून येणारे सांडपाणी कमी झाल्याचे म्हणणे त्यांनी मांडले आणि प्रतिज्ञापत्रातील माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा केला. प्रक्रिया केलेल्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढल्याबाबत प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याकडे त्यांनी लक्षवेधले. त्यामुळे संबंधित खात्याला नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश लवादाने दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ आॅगस्टला होेणार आहे.