शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

श्वानांना लागला कर्मचाऱ्यांचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:40 IST

अ‍ॅनिमल वेल्फेअर : आजारी, अपघातात जखमी झालेल्यांवर केली जाते शस्त्रक्रिया

अंबरनाथ : शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा भटक्या कुत्र्यांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अ‍ॅनिमल वेल्फेअर या संस्थेतर्फेनिर्बिजीकरण केले जाते. तसेच आजारी, अपघात झालेल्या कुत्र्यांवरही शस्त्रक्रिया केली जाते. अपघातात जखमी झालेल्या श्वानांना काळजी घेणाºया कर्मचाऱ्यांचा लळा लागला आहे.

अंबरनाथ येथील भाजी मंडईजवळील नगरपालिकेच्या अ‍ॅनिमल वेल्फेअर या संस्थेतर्फे शहरातील भटक्या, मोकाट तसेच अपघातात जखमी झालेल्या अशा श्वानांना संस्थेची टीम जाऊन पकडून आणते. त्यांच्यावर डॉ. राजेश सहारे शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांच्यावर औषधोपचार करण्याचे काम केले जाते. चार ते पाच महिन्यापूर्वी रेल्वेखाली येऊन अपघातात जखमी झालेला एक श्वानाला तेथे आणले होते. त्याच्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. त्या श्वानाला भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करून त्या श्वानाचा एक पाय कापण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर तेथील विजय रणशूर यांनी आणि त्यांच्या पथकाने त्या श्वानाची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. यामुळे त्या श्वानाला तेथील लळा लागल्याने तो तेथून जाण्यास तयार नाही. अनेकवेळा त्या श्वानास नेऊन सोडण्यात आले, मात्र तो परत तेथेच येतो. त्यामुळे तो श्वान आता तेथेच राहत आहे. श्वानांसाठी दररोज १० किलो चिकन आणि आठ किलो भात, चार लिटर दूध इतका खुराक सकाळ, संध्याकाळ दिला जातो.जिल्ह्यातील विविध शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकारही वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पालिका निर्बिजीकरण करत असले तरी शहरातील कुत्र्यांची दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेdogकुत्रा