शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:02 IST

ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे.

ठाणे : उल्हासनगर मध्ये भटका कुत्र्याच्या चाव्यामुळे सात मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर आता प्रत्येक शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा आ वासून उभी राहिली आहे. ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे.शुक्रवारी उल्हासनगरच्या कॅम्प नं. ३ मध्ये भटक्या कुत्र्याच्य चाव्यामुळे सात मुले जमखी झाल्याची घटना घडली. परंतु, एकाच वेळेस सात जणांना चावा घेतल्याने ही घटना चर्चिली गेली आहे. परंतु एखाद दुसरी घटना असती तर ती उघड झाली नसती. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक जण कुत्र्याने चावा घेतल्यास खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत नाही. जे रुग्ण पालिकेकडे उपचार घेतात. त्यांचीच नोंद पालिकेच्या दप्तरी होत असते. त्यामुळे महापालिकेच्या दप्तरी ही नोंद केवळ ४ ते ५ पर्यंतच कधी कधी असते. परंतु, वास्तविक हा आकडा ५० ते ६० च्या घरात असल्याची माहिती भटक्या कुत्र्यांवर अभ्यास करणारे सत्यजीत शहा यांनी सांगितले.ठाण्यात महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर या अशा भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे, याच कुटुंबियातील १० वर्षीय आर्यनला मागील महिन्यात दुकानात गेला असता त्याच्या पाठीवर चढून एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यामुळे आजही त्याच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी भीती कायम आहे. त्यातही लहान मुलांवरील भटक्या कुत्र्यांचे हल्ले हे वाढल्याचे दिसत आहे.निर्बिजीकरणानंतरही संख्येत वाढश्वानदंशाच्या घटनांपैकी ८० टक्के घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालकांचा समावेश असल्याचेही शहा यांनी सांगितले. ठाणे शहरात अंदाजे जवळपास एक लाख एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.ठाणे पालिकेचा उदासीनपणा हे सर्वात मोठे कारण समोर येत असून निर्बिजीकरण झाल्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही आजही भटक्या कुत्र्यांची गणना मात्र पालिकेकडून झालेली नाही. दीड वर्षापूर्वी या कुत्र्यांची गणना करण्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही.

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे