शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:02 IST

ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे.

ठाणे : उल्हासनगर मध्ये भटका कुत्र्याच्या चाव्यामुळे सात मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर आता प्रत्येक शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा आ वासून उभी राहिली आहे. ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे.शुक्रवारी उल्हासनगरच्या कॅम्प नं. ३ मध्ये भटक्या कुत्र्याच्य चाव्यामुळे सात मुले जमखी झाल्याची घटना घडली. परंतु, एकाच वेळेस सात जणांना चावा घेतल्याने ही घटना चर्चिली गेली आहे. परंतु एखाद दुसरी घटना असती तर ती उघड झाली नसती. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक जण कुत्र्याने चावा घेतल्यास खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत नाही. जे रुग्ण पालिकेकडे उपचार घेतात. त्यांचीच नोंद पालिकेच्या दप्तरी होत असते. त्यामुळे महापालिकेच्या दप्तरी ही नोंद केवळ ४ ते ५ पर्यंतच कधी कधी असते. परंतु, वास्तविक हा आकडा ५० ते ६० च्या घरात असल्याची माहिती भटक्या कुत्र्यांवर अभ्यास करणारे सत्यजीत शहा यांनी सांगितले.ठाण्यात महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर या अशा भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे, याच कुटुंबियातील १० वर्षीय आर्यनला मागील महिन्यात दुकानात गेला असता त्याच्या पाठीवर चढून एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यामुळे आजही त्याच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी भीती कायम आहे. त्यातही लहान मुलांवरील भटक्या कुत्र्यांचे हल्ले हे वाढल्याचे दिसत आहे.निर्बिजीकरणानंतरही संख्येत वाढश्वानदंशाच्या घटनांपैकी ८० टक्के घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालकांचा समावेश असल्याचेही शहा यांनी सांगितले. ठाणे शहरात अंदाजे जवळपास एक लाख एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.ठाणे पालिकेचा उदासीनपणा हे सर्वात मोठे कारण समोर येत असून निर्बिजीकरण झाल्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही आजही भटक्या कुत्र्यांची गणना मात्र पालिकेकडून झालेली नाही. दीड वर्षापूर्वी या कुत्र्यांची गणना करण्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही.

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे