शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

राजा आताच चुकायला लागला का? आधीचे बरोबर होते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:18 IST

राजा आताच चुकायला लागला का? आधीचे सारे राजे बरोबर होते का, असा प्रश्न विचारला आहे.

डोंबिवली : बडोद्यातील साहित्य संमेलनात लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्षपदाचे विचार मांडताना ‘राजा तू चुकत आहेस, सुधारलं पाहिजे’ या घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटू लागले असून डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी राजा आताच चुकायला लागला का? आधीचे सारे राजे बरोबर होते का, असा प्रश्न विचारला आहे. गेल्या तीन वर्षातील राजवटीला शिव्या घालून धन्यता मिळवायची आणि त्यांच्याचकडे देणग्या मागायच्या हा काय प्रकार आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला. राजा चुकतो आहे, हे सांगणाºयांना साहित्यिक म्हणायचे का, अशी भूमिका त्यांनी घेतली.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळांतर्फे देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार यंदा शेवडे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शेवडे यांनी पुरस्काराच्या रकमेत स्वत:च्या दहा हजार रूपयांची भर घालून २१ हजारांचा धनादेश शाळेच्या इमारतीस अर्थसहाय्य म्हणून संस्थेकडे सुपूर्द केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा शुभदा जोशी, कार्यवाह महेश ठाकूर, कार्याध्यक्षा सविता टांकसाळे, आशीर्वाद बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.राजा तू चुकला असे बोलणारे सगळे साहित्यिक बरोबर आहेत का? राजा काय तीन वर्षात चुकू लागला आहे का? या आधीचे सगळे राजे बरोबर होते का? राजवट वेगळी आली, हे तुमच्या पोटात दुखतेय का? ती जाणीव तुम्ही व्यक्त करीत आहात. मग तुम्हाला तरी साहित्यिक म्हणायचे का, असा प्रश्न पडतो. ठराविक विचारसरणीच्या लोकांना नावे ठेवायची, पुरस्कारवापसीची लाट येते. ते परत करण्याची नाटक करायची. सरकारने एनजीओ बंद केल्या. सरकारी पातळीवर व्याख्याने द्यायला बोलावले नाही, म्हणून उत्पन्न थांबले आणि सरकार असहिष्णु ठरले, अशी कारणे यामागे असल्याचा आरोप शेवडे यांनी केला.साहित्य संमेलनाचे नियंत्रण मला कधीही आलेले नाही. कदाचित माझी विचारसरणी त्याला कारणीभूत असेल, असे सांगत टीका करायची आणि त्यानंतरही देणगी वाढवून मागायची, या वृत्तीवर त्यांनी टीका केली. मराठी भााषेवर काय वेळ आली आहे, असे ते म्हणाले. सरकारच्या वाईट गोष्टीवर टीका करा, पण माध्यमांमध्ये चर्चेचे विषय ठरवावेत, म्हणून बोल्ड बोलू नका, असा सल्ला शेवडे यांनी टीकाकारांना दिला.सावरकरांनी कधीही ब्रिटीश सरकारची माफी मागितली नाही. अनंत यातना सोसून सावरकर जिवंतपणे अंदमानातून सुटले, हीच खरी कम्युनिस्टांची पोटदुखी होती. सावरकरांना दुर्लक्षित ठेवण्यामागेही विचारसरणी कारणीभूत आहे. त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. मी सावरकरप्रेमी आहे. भक्त नाही. कारण भक्त हा आंधळा असतो. इंग्लंडमधील सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबडेकर याची घरे सरकारने ताब्यात घेतली. मात्र सावरकरांच्या इंडिया हाऊसकडे दुर्लक्ष केले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.