शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बारमध्ये रात्री ११ नंतर काेरोना येताे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:35 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळेचे काही निर्बंध लादलेले आहेत. या ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळेचे काही निर्बंध लादलेले आहेत. या निर्बंधांमध्ये अन्य ठिकाणी वेळेची मर्यादा ही कमी ठेवली आहे. मात्र, बारची वेळ रात्री ११ पर्यंत ठेवण्यात आली आहे. बारमध्ये काय, ११ नंतर कोरोना येतो का, असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

आमदार पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली आहे की, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सगळ्यात जास्त चाकरमानी वर्ग राहतो. जो मुंबईला पोटापाण्यानिमित्त नोकरीस जातो. तो कामावरून संध्याकाळी येतो. तो घरी पोहाेचण्याआधीच ७ वाजता दुकाने बंद झाली तर त्याने त्याला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी कधी करायची, असा प्रश्न आहे. एकीकडे दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार, असे म्हणणाऱ्या पालिकेने बारला रात्री ११ वाजेपर्यंत सूट दिली आहे, याकडे आ. पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

राज्य सरकारकडे कोरोना एक्झिट प्लानच नाही. सुरुवातीला कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा आरोग्य यंत्रणा अपुरी होती. कोट्यवधींचा खर्च करून आरोग्य यंत्रणा उभी केली गेली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कार, रिक्षाचालकांचे लसीकरण प्राधान्याने केले पाहिजे, याकडे आ. पाटील यांनी लक्ष वेधून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना ट्विट केले आहे.

टोलनाक्याचे कंत्राट संपल्याने वसुली बंद

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई व कोन या टोलनाक्यांवरील कंत्राट संपुष्टात आल्याने राज्य सरकारने टोलवसुली बंद केली आहे. याचे श्रेय खासदार घेत असल्याची टीकाही आमदारांनी केली आहे. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामास मंजुरी देताना सरकारने या रस्त्यावरील टोल २०३१ पर्यंत सुरू राहणार, असे म्हटले होते. त्यामुळे दोन्ही नाके कायमचे बंद केले आहे की रस्त्याचे काम सुरू झाल्यावर पुन्हा टोलवसुली सुरू केली जाईल, याविषयी पत्रात राज्य रस्तेविकास महामंडळाने सुस्पष्ट केले नसल्याकडे त्यांनी बोट ठेवले आहे.

----------------------