शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई नको रे बाबा! साखरोली गावाला प्रथमच बसली झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:23 IST

या तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण झाल्यास या तलावातील पाणी अनेक गावांना संजीवनी ठरेल. मात्र, हे काम आता होणे शक्य नाही.

भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, ज्या गावांना कधीच पाणीटंचाईचे चटके जाणवले नव्हते. मात्र, पाणीटंचाई काय असते, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होते, याची प्रचीती साखरोली ग्रामस्थांना आली आहे. त्यामुळे अशी टंचाई पुढील वर्षीपासून नको, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

डोंगराच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे साखरोली. सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गाने परिपूर्ण असे. डोंगराच्या पलीकडे तानसा धरणाचा पाण्याचा साठा, तर गावासाठी असणारा तलावही दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी. या तलावात अनेक गावांची तहान भागेल इतके पाणी. या पाण्यावरच आटगाव, कानविंदे, पुनध्ये या ग्रामपंचायतींच्या गावांमधील ग्रामस्थांची तहान भागवण्याची क्षमता असणाऱ्या साखरोली गावच्या हद्दीत असलेला तलाव! मात्र, यावर्षी पावसाने लवकरच उघडीप दिल्याने तलावात येणारे ओहळ, लवकरच कोरडे झाले. तलावाची खोली कमी, मात्र अनेक वर्षांत गावामधील वाढलेली लोकसंख्या यामुळे पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे आज तलावातील पाणीपातळी खूपच खाली गेल्याने आता तलावाखाली असणाºया विहिरी भरण्यासाठी दोनदोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने या गावाला तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तोही पुरेसा नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

या तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण झाल्यास या तलावातील पाणी अनेक गावांना संजीवनी ठरेल. मात्र, हे काम आता होणे शक्य नाही. कारण, काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे जर का पाऊस पुन्हा या वर्षी मुबलक प्रमाणात पडला नाही, तर मात्र या गावांना पुन्हा पुढील वर्षी पाणीटंचाईसारख्या बिकट समस्येला सामोरे जावे लागेल, हे मात्र नक्की.

कधी नव्हे ती पाणीटंचाई आमच्या गावात निर्माण झाल्याने मोठी पाणीसमस्या निर्माण झाली आहे. पुढील वर्षी ती होऊ नये. - संजय नलावडे, ग्रामस्थ

या गावातील ग्रामपंचायतींनी तलावाचे खोलीकरण, मजबुतीकरण यांचा ठराव दिल्यास त्यावर तत्काळ विचार होईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :Waterपाणी