शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई नको रे बाबा! साखरोली गावाला प्रथमच बसली झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:23 IST

या तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण झाल्यास या तलावातील पाणी अनेक गावांना संजीवनी ठरेल. मात्र, हे काम आता होणे शक्य नाही.

भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, ज्या गावांना कधीच पाणीटंचाईचे चटके जाणवले नव्हते. मात्र, पाणीटंचाई काय असते, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होते, याची प्रचीती साखरोली ग्रामस्थांना आली आहे. त्यामुळे अशी टंचाई पुढील वर्षीपासून नको, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

डोंगराच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे साखरोली. सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गाने परिपूर्ण असे. डोंगराच्या पलीकडे तानसा धरणाचा पाण्याचा साठा, तर गावासाठी असणारा तलावही दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी. या तलावात अनेक गावांची तहान भागेल इतके पाणी. या पाण्यावरच आटगाव, कानविंदे, पुनध्ये या ग्रामपंचायतींच्या गावांमधील ग्रामस्थांची तहान भागवण्याची क्षमता असणाऱ्या साखरोली गावच्या हद्दीत असलेला तलाव! मात्र, यावर्षी पावसाने लवकरच उघडीप दिल्याने तलावात येणारे ओहळ, लवकरच कोरडे झाले. तलावाची खोली कमी, मात्र अनेक वर्षांत गावामधील वाढलेली लोकसंख्या यामुळे पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे आज तलावातील पाणीपातळी खूपच खाली गेल्याने आता तलावाखाली असणाºया विहिरी भरण्यासाठी दोनदोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने या गावाला तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तोही पुरेसा नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

या तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण झाल्यास या तलावातील पाणी अनेक गावांना संजीवनी ठरेल. मात्र, हे काम आता होणे शक्य नाही. कारण, काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे जर का पाऊस पुन्हा या वर्षी मुबलक प्रमाणात पडला नाही, तर मात्र या गावांना पुन्हा पुढील वर्षी पाणीटंचाईसारख्या बिकट समस्येला सामोरे जावे लागेल, हे मात्र नक्की.

कधी नव्हे ती पाणीटंचाई आमच्या गावात निर्माण झाल्याने मोठी पाणीसमस्या निर्माण झाली आहे. पुढील वर्षी ती होऊ नये. - संजय नलावडे, ग्रामस्थ

या गावातील ग्रामपंचायतींनी तलावाचे खोलीकरण, मजबुतीकरण यांचा ठराव दिल्यास त्यावर तत्काळ विचार होईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :Waterपाणी