शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ग्रंथालयांसाठी सरकारवर ताण नको, विजय बेडेकर यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:51 IST

ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू नये. आजची ही वर्षानुवर्षाची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आपण सर्वांनी एकत्र येऊन उभारलेली आहेत. शासनावरचा ताण आपण कमी केला पाहिजे. सरकार ही बधीर यंत्रणा आहे.

ठाणे  - ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू नये. आजची ही वर्षानुवर्षाची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आपण सर्वांनी एकत्र येऊन उभारलेली आहेत. शासनावरचा ताण आपण कमी केला पाहिजे. सरकार ही बधीर यंत्रणा आहे. आपण थकू पण ते थकणार नाही. त्यामुळे आपण आपले काम करण्यात जास्त फायदा आहे, असे परखड मत डॉ. विजय बेडेकर यांनी ग्रंथालय संमेलनात व्यक्त केले.शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात वाचनालयांच्या स्वरूपावर ते बोलत होते. या सत्रात अच्युत गोडबोले, प्रा.नारायण बारसेही सहभागी झाले होते. गेल्या काही काळात ग्रंथालयांचे स्वरूप आमूलाग्र बदलते आहे. ग्रंथालये ही आता गोडाऊन राहिलेली नाहीत. उद्याचा विचार करायचा असेल, तर ग्रंथालयांपेक्षा वाचकांनी बदलले पाहिजे. वाचक मागणी करतील तेव्हा ग्रंथालयांमध्ये बदल होईल.ग्रंथालये बदलून वाचक बदलणार नाही. तर डिजिटलायजेशनच्या जगात मराठीचा विचार तातडीने करायला हवा. त्यासाठी आपल्याला प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या यांत्रिकीकरणाच्या बाबतीत आपण १० व्या पायरीवर आहोत. ते १०० व्या पायरीवर जाण्याची गरज आहे, असे डॉ. बेडेकर म्हणाले.आज ग्रंथालयांमध्ये व्हरायटी पाहायला मिळते. काही ठिकाणी खूप पुस्तके आहेत मात्र त्याची योग्य मांडणी नाही. कामात सुसूत्रता नाही, अशी परिस्थिती दिसते. तर काही ठिकाणी पुस्तके कमी असली, कर्मचाºयांना पुरेसा पगार , सुविधा नसल्या तरी काम मात्र सुनियोजित पद्धतीने चालते. सरकारी लायब्ररींची अवस्था तर आणखी वेगळी असते. मात्र उद्याच्या काळात संग्रहालयांचे डिजिटलायझेशन होऊन त्याच्या स्वरूपात बदल झाले तरी वाचकाची गरज भागवणे हे त्यांचे महत्त्वाचे काम आहे, असे अच्युत गोडबोले म्हणाले.प्रा. नारायण बारसे यांनीही याविषयी माहिती दिली. भारतात केवळ २० राज्यांमध्ये ग्रंथालय कायदा मंजूर झाला आहे. आपण पुरोगामी समजणाºया महाराष्टÑातही कायदा मंजूर व्हायला १९६८ सालाची वाट पाहावी लागली.गेली अनेक वर्षे ग्रंथ-ग्रंथालये भविष्यात राहतील का, असे प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र बदलत्या काळानुसार गं्रथालयांमध्ये खूप बदल होणार असले तरी ग्रंथ आणि ग्रंथालये टिकून राहणार आहेत. तसेच खाजगी ग्रंथालये कितीही अ‍ॅडव्हान्स झाली, तरी सार्वजनिक वाचनालयांची गरज कायम असणार आहे, असे मत प्रा.बारसे यांनी व्यक्त केले. मिलिंद भागवत यांनी या सर्वांना या विषयावर बोलते केले.दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन आवश्यकठाणे : दुर्मीळ पुस्तकांचे योग्य पद्धतीने डिजिटलायझेशन झाले नाही, तर ही पुस्तके पुढच्या पिढीला उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे या पुस्तकांचे जतन करणे, स्कॅनिंग करणे ही आताच्या पिढीची जबाबदारी आहे, असे मत लेखक, प्रकाशक, संगणकीय तंत्रज्ञानतज्ज्ञ माधव शिरवळकर यांनी रविवारी व्यक्त केले.शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात ‘डिजिटलायझेशन आणि इ बुक्स’ यावरील प्रात्यक्षिकावेळी ते बोलत होते. सुरूवातीला शिरवळकर यांनी पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचे स्वरुप सांगताना फक्त स्कॅनिंग की आणखी काही? आजच्या ग्रंथालयांमध्ये वापरले जाणारे स्कॅनर्स, सामान्य फ्लॅट बेड स्कॅनर, स्वयंचलित ओव्हरहेड स्कॅनर या मुद्दयांवर प्रकाश टाकला.दोन मराठी पुस्तके डाऊनलोड करुन ती मोबाईल फोनवर वाचण्याच्या प्रात्यक्षिकावर ते बोलले. संगणकशास्त्र व डिजिटलायझेशन- ईबुक्स तज्ज्ञ राहुल गुंजाळ यांनी डिजिटलायझेशनच्या गरजेवर थोडक्यात माहिती देताना १० हजार पुस्तके या फॉर्ममध्ये रूपांतरीत झाल्याचे सांगितले.त्यानंतर स्टेजेस आॅफ डिजिटलायझेशनचा तपशील त्यांनी दिला. ५० ते ६० वर्षे जुनी किंवा त्यापूवीर्ची किंवा जी पुन्हा प्रकाशित होणार नाहीत, अशी दुर्मीळ पुस्तके, जुनी वर्तमानपत्रे, हस्तलिखिते यांचे डिजिटलायझेशन केले पाहिजे, असा आग्रह गुंजाळ यांनी धरला.ग्रंथालयांचा गौरवच्संजीव ब्रह्मे, दा. कृ. सोमण, विद्याधर वालावलकर, विद्याधर ठाणेकर, चांगदेव काळे, पद्माकर शिरवाडकर, हेमंत काणे, महादेव गायकवाड आदींच्या उपस्थितीत सायंकाळी समारोप सोहळा पार पडला.च्यावेळी उत्कृष्ट उपक्र म राबविणाºया ग्रंथालयाना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यात प्रथम पारितोषिक पुणे मराठी ग्रंथालय, द्वितीय पारितोषिक कोल्हापूरचे करवीरनगर वाचन मंदिर, तृतीय पारितोषिक इचलकरंजीचे आपटे वाचन मंदिर, उत्तेजनार्थ पुरस्कार साताºयातील छत्रपती प्रतापिसंह महाराज (थोरले) नगर वाचनालय आणि सांगलीतील जिल्हा नगर वाचनालयाला देण्यात आला.च्त्यानंतर पुणे मराठी ग्रंथालय व करवीर नगर वाचन मंदिराने पीपीटीद्वारे आपल्या वाचनालयाचा प्रवास उलगडला. पसायदानाने कार्यक्र माची सांगता झाली.

टॅग्स :thaneठाणे