शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वंशाच्या दिव्यासाठी पणती विझवू नका

By admin | Updated: November 17, 2016 06:55 IST

वंशाला दिवाच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-बाबांनी पणती विझणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण पणतीमुळेच

चिकणघर : वंशाला दिवाच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-बाबांनी पणती विझणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण पणतीमुळेच दिवा उजळण्याची वाट मोकळी होते. याची जाणीव ठेऊन जन्माला येणाऱ्या मुलीला जगू द्या, तिला मोकळा श्वास घेऊ द्या, अशी साद कीर्तनकार हभप विनता पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला घातली.गौरीपाडा येथे कार्तिक स्नाननिमित्त झालेल्या हरिनाम कीर्तन सोहळा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कल्याण परिसरातील वारकरी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांवर संस्कार करण्याचे आई-बाबांचे केवळ कर्तव्यच नाही तर जबाबदारीही आहे. सध्याच्या जागतिकीकरणामुळे मानवी जीवन वेगवान झाले आहे. याचा परिणाम संस्कार बिघडण्यात झाला आहे, असे सांगून चाकरमानी महिला मुलांच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. सहा महिन्यांच्या अपत्याला त्यांना पाळणा घरात ठेवावे लागत आहे. यामुळे अशा मुलांना आईच्या मायेची ऊब मिळत नाही. त्यातच टीव्हीसारख्या यंत्राने घराघरात वेड लावल्यामुळे संस्कार आणि संस्कृती या दोन्हीवर परिणाम होत आहे. म्हणून मुलगा असो वा मुलगी भेदभाव न करता ते अज्ञानातून सज्ञानात प्रवेश करीपर्यंत आईबाबांनी आपल्या मुलांवर स्वत: संस्कार करण्यावर भर देण्याची गरज असते, असा प्रबोधनात्मक सल्ला पाटील यांनी कीर्तनातून दिला. कोजागिरी ते कार्तिक त्रिपुरा पौर्णिमा, असा महिनाभर हा कार्यक्रम सुरू होता. (वार्ताहर)