शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

आक्षेपार्ह विषयांची अंमलबजावणी नको

By admin | Updated: May 27, 2017 02:14 IST

पालिकेच्या २० मे च्या सर्वसाधारण सभेत अवघ्या २० मिनिटांत तब्बल ४७२ विषय सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केले. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपाने मात्र आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पालिकेच्या २० मे च्या सर्वसाधारण सभेत अवघ्या २० मिनिटांत तब्बल ४७२ विषय सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केले. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपाने मात्र आक्षेप नोंदवत या मनमानी कारभारावर ठिय्या आंदोलनही केले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आक्षेपार्ह निश्चयाची सूची देण्याची सूचना केली. मात्र, भाजपा गटनेते मिलिंद पाटणकर यांना तोंडी आश्वासनावर विश्वास नसल्याने त्यांनी आक्षेपार्ह विषयांची सूची आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करत पालिका आयुक्तांना निवेदन देऊन या विषयावर प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. निवेदनात आक्षेप असलेल्या विषयात प्रकरण ३७ हा वृक्ष प्राधिकरणाचा विषय असून यात १४ सदस्यांची निवड आवश्यक आहे. मात्र, केवळ ६ सदस्यांच्या निवडीचा विषय सर्वसाधारण महासभेत आणून महासभेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाटणकर यांचे म्हणणे आहे. तेव्हा १४ सदस्यांची नावे महासभेत आणावी. प्रकरण ४५ व ४६ बोगस डॉक्टरांची नोंदणी पालिकेकडे करण्याबाबत, प्रकरण ५९ भार्इंदरपाडा येथील मैदान रेडीरेकनर दराच्या १ टक्का दराने भाडेतत्त्वावर देणे अयोग्य आहे. देखभाल व ताबा पालिकेचाच असावा. गडकरी रंगायतन शेडचे काम निविदा काढण्यापूर्वीच सुरू केले. मुख्यालयस्तरावर नियुक्त कंत्राटदाराकडून निविदा न मागवता काम करण्यात आले. अतिक्र मण विभागाचे काम वेगळ्या पद्धतीचे व तत्काळ असू शकते. त्यामुळे दर जास्त असतात. हे काम त्या पद्धतीचे नसल्यामुळे निविदा काढणे आवश्यक होते. डीजी ठाणे प्रकल्पाकरिता गोषवाऱ्यात नमूद आहे की, महासभेची प्रशासकीय मान्यता २० आॅक्टोबर २०१६ च्या सभेत घेण्यात आली. ही महासभा गोंधळात संपल्यामुळे या प्रकल्पाविषयी कोणतीही माहिती सदस्यांना देण्यात आली नाही. एवढ्या मोठ्या प्रकल्पाची माहिती सभागृहासमोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रकरण सविस्तर माहितीसह सभागृहासमोर ठेवण्यात यावे. एलबीएस रोडवर रहेजा कॉम्प्लेक्सजवळ पादचारी पूल बांधणे, याप्रकरणी रहेजा कॉम्प्लेक्सबाहेर एलबीएस मार्गाचे जे रु ंदीकरण झाले आहे, ते उपयोगात का आणले जात नाही, या प्रश्नाचे उत्तर द्यावे. एकच निविदा असतानाही कंत्राटदार निश्चित करण्यात आले. खाडीच्या पाण्याचे विक्षारण याविषयी पाटणकर यांच्या १९ मे रोजीच्या पत्रामधील एकाही प्रश्नाचे उत्तर नाही.