शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

वन कार्यालय नव्हे गोठा

By admin | Updated: August 17, 2016 02:20 IST

भिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे.

रोहिदास पाटील,  अनगावभिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे. वनअधिकाऱ्यांसह कर्मचारीही कार्यालयाकडे फिरकत नसल्याने वीस गावे, सहा पाड्यांच्या शेतकऱ्यांना आपल्या कामाकरिता ससेहोलपट करावी लागत आहे. तर येथील नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कार्यालयाच्या मागील बाजूस बैल बांधून गोठाच तयार केला आहे.ठाणे व भिवंडी वनविभाग यांच्या अखत्यारित पारिवली वन विभागाचे कार्यालय आहे. आदिवासींसह संमिश्र लोकवस्ती आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना वनपट्टे मिळतात. त्याची माहिती व कातकरी समाजाची जमीन नावे करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पारिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र येथे येणाऱ्या आदिवासींना कार्यालयास कुलूप बघून परतावे लागत आहे.पंधरा वर्षापासून इमारतीची दुरुस्ती न केल्याने ती कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. वनअधिकारी, कर्मचारी येत नसल्याने त्याची देखभाल होत नाही. अस्वच्छता पसरली आहे. इमारतीचे कौले तसेच दरवाजा, खिडक्या तुटलेल्या आहेत. दोन खोल्यांमधील लाद्याही तुटलेल्या आहेत. पाठीमागील खोल्याच्या मोकळ्या जागेत स्थानिकांनी एका खोलीत बैल बांधून गोठा बनविला आहे. तर दुसऱ्या खोलीमध्ये शेतीचे साहित्य ठेवले आहे. वनविभागाच्या या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये गुरांचा गोठा जर तयार होत असेल तर वनविभाग झोपा काढतोय का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. वनाधिकारी आय.एस. ठाकूर व त्यांचे सहकारी येथे फिरकत नसल्यामुळे कार्यालयाचा उकिरडा झाला आहे. शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.या इमारतीची दुरुस्ती करावी यासाठी वन विभागाने ठाणे वन विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही साधी दुरुस्तीही करण्यात न आल्याने प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभागाने या इमारतीला निधी मंजूर करुन नव्याने बांधकाम करण्याची मागणी होत आहे.