शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

वन कार्यालय नव्हे गोठा

By admin | Updated: August 17, 2016 02:20 IST

भिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे.

रोहिदास पाटील,  अनगावभिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे. वनअधिकाऱ्यांसह कर्मचारीही कार्यालयाकडे फिरकत नसल्याने वीस गावे, सहा पाड्यांच्या शेतकऱ्यांना आपल्या कामाकरिता ससेहोलपट करावी लागत आहे. तर येथील नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कार्यालयाच्या मागील बाजूस बैल बांधून गोठाच तयार केला आहे.ठाणे व भिवंडी वनविभाग यांच्या अखत्यारित पारिवली वन विभागाचे कार्यालय आहे. आदिवासींसह संमिश्र लोकवस्ती आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना वनपट्टे मिळतात. त्याची माहिती व कातकरी समाजाची जमीन नावे करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पारिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र येथे येणाऱ्या आदिवासींना कार्यालयास कुलूप बघून परतावे लागत आहे.पंधरा वर्षापासून इमारतीची दुरुस्ती न केल्याने ती कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. वनअधिकारी, कर्मचारी येत नसल्याने त्याची देखभाल होत नाही. अस्वच्छता पसरली आहे. इमारतीचे कौले तसेच दरवाजा, खिडक्या तुटलेल्या आहेत. दोन खोल्यांमधील लाद्याही तुटलेल्या आहेत. पाठीमागील खोल्याच्या मोकळ्या जागेत स्थानिकांनी एका खोलीत बैल बांधून गोठा बनविला आहे. तर दुसऱ्या खोलीमध्ये शेतीचे साहित्य ठेवले आहे. वनविभागाच्या या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये गुरांचा गोठा जर तयार होत असेल तर वनविभाग झोपा काढतोय का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. वनाधिकारी आय.एस. ठाकूर व त्यांचे सहकारी येथे फिरकत नसल्यामुळे कार्यालयाचा उकिरडा झाला आहे. शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.या इमारतीची दुरुस्ती करावी यासाठी वन विभागाने ठाणे वन विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही साधी दुरुस्तीही करण्यात न आल्याने प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभागाने या इमारतीला निधी मंजूर करुन नव्याने बांधकाम करण्याची मागणी होत आहे.