शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘त्या’ बिल्डरांना मोकाट सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:39 IST

रेरा हा कायदा अत्यंत चांगला तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये प्रत्येक बिल्डरला नोंदणी करणे गरजेचे आहे.

कल्याण : रेरा हा कायदा अत्यंत चांगला तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये प्रत्येक बिल्डरला नोंदणी करणे गरजेचे आहे. या कायद्यान्वये अधिकृत बिल्डर नोंदणी करणार आहेत. मात्र, ज्यांच्याकडून सर्रासपणे बेकायदा बांधकामे उभी करून नागरिकांची फसवणूक केली जाते, विकास आराखड्याचा बट्ट्याबोळ केला जातो. त्यांनाही रेराचा वचक असावा. त्यांना या कायद्याच्या कार्यकक्षेत आणावे, अशी मागणी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केली आहे.वास्तुविशारद पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यापूर्वी पाटील यांनी याप्रकरणी राज्यभरातील २८८ आमदार व ८८ विधान परिषद सदस्य यांचा याविषयी पत्र पाठवून या मागणीचा विचार करावा, हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करावा, असे आवाहन केले होेते. त्यापैकी मल्लिकाअर्जन रेड्डी व कल्याण पश्चिमेतील भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी पाटील यांच्या पत्राची दखल घेतली असल्याचे कळवले आहे. याविषयी विधिमंडळात लक्षवेधी सूचना उपस्थित केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.रेरा कायदा राज्यात १ मे २०१७ पासून लागू झाला. या कायद्यान्वये बिल्डरांनी त्यांच्या प्रकल्पाची नोंदणी ३१ जुलैपर्यंत करणे बंधनकारक होते. आज ही मुदत संपली. कारण, या मुदतीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. पाटील यांनी या मुदतीचा पुनरुच्चार करत रेरा कायदा अत्यंत चांगला आहे. त्याद्वारे घरखरेदी करणाºया ग्राहकांची फसवणूक थांबणार आहे. त्यात शिक्षेची तरतूद असल्याने या कायद्याचे उल्लंघन करणाºया बिल्डरला तीन वर्षांची कैद व प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी १० टक्के दंड आकारला जाणार आहे.