शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

...तर भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:45 IST

दिव्यांगांनी प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी ‘मातोश्री’वर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला.

कल्याण : दिव्यांगांनी प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी ‘मातोश्री’वर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोर्चा त्याआधीच अडवण्यात आला. त्यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेल्या आश्वासनाअंती आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, १५ दिवसांत मागण्या मंजूर करा, अन्यथा दीपावलीपासून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांच्या घरांसमोर भीख मांगो आंदोलन छेडू, असा इशारा पुन्हा दिव्यांग सेनेने दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून केली जाईल, अशी माहिती दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिली.शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका आणि नगर परिषदांमध्ये दिव्यांग व्यक्तींची पुरती उपेक्षा झाली आहे. योजनांसाठी राखीव ठेवलेल्या निधीत भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप दिव्यांग सेनेने केला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग रविवारी थेट ‘मातोश्री’वर मोर्चा काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार होते. त्यानुसार, माहीम येथून मोर्चा निघाला. परंतु, तो शेकाप भवनची गल्ली पार करण्याअगोदरच पोलिसांनी अडवला. उद्धव ठाकरे हे शिर्डीला गेल्याची माहिती देत ‘मातोश्री’वरून शिष्टमंडळ आपल्या भेटीस येत आहे, त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना केले. महापौर महाडेश्वर यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांच्या आश्वासनाअंती आंदोलन स्थगित करण्यात आले.ठाकरे यांना मोर्चाची कल्पना दिली असताना त्यांनी पळ काढल्याचा आरोप दिव्यांग सेनेने केला आहे. मोर्चा स्थगित करताना मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ दिवसांची मुदत सेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास दीपावलीपासून भीख मांगो आंदोलन छेडण्याचा पवित्रा दिव्यांगांनी घेतला आहे. ‘मातोश्री’वर काढलेल्या मोर्चात सत्ताधारी शिवसेनेने पोलीस बळाचा वापर केला असला, तरी मागण्या मान्य न झाल्यास दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून छेडले जाणारे भीख मांगो आंदोलन अधिक आक्रमक असेल, असे साळवी यांनी सांगितले.।निधीचा चुकीच्या पद्धतीने वापरबहुतांश महापालिका आणि नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, वारंवार पत्रव्यवहार आणि निदर्शनास आणूनही कोणताही फरक पडत नसल्याने आंदोलनाचा दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे.कर्णबधिर, अंध, गतिमंद, शारीरिक अपंग यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांचा तीन कोटींचा निधी काही ठिकाणी वापरला गेलेला नाही, तर काही महापालिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे.