शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

ताकद दाखवायला लावू नका- प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 06:28 IST

प्रताप सरनाईकांचा पलटवार : लोकांची भावना समजत नसलेल्यांनी राजकारण करू नये

ठाणे : नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चात मी फक्त सहभागी झालो होतो. मूठभर मतांसाठी लाचार होण्यापेक्षा शेकडो लोकांना काय हवे हे समजत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारण करुच नये, असा पलटवार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केला.कोणाची वैयक्तिक ताकद किती आहे, हे दाखविण्याची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांना दिला. ज्या लोकांनी मते देऊन तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणले आहे, त्यांची कामे करण्याऐवजी तुम्ही सुपारी वाजविण्याची कामे करीत आहात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.नीळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या स्मशानभूमीचा मुद्दा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निकाली निघाला आहे. त्यामुळे पुन्हा महासभेत स्मशानभूमीबाबत चर्चा होणे अतिशय चुकीचे होते. त्यातही शिवसेनेच्याच काही लोकप्रतिनिधींनी पुन्हा स्मशानभूमीच्या ठरावाला मंजुरी देणे हा एकनाथ शिंदे यांचा अपमान असल्याचे खडे बोल सरनाईक यांनी म्हस्के यांचे नाव घेता सुनावले. हा पक्षाचादेखील अपमान असल्याने पालकमंत्री याची गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.नीळकंठ आणि रेप्टॉकासच्या जागेवरील स्मशानभूमीच्या वादाची राख शमली असतानाच शुक्रवारच्या महासभेत विरोधकांनी पुन्हा त्यात ठिणगी टाकल्याने हा वाद भडकला. रेमंडच्या जागेवर स्मशानभूमीबाबतचा ठराव पुन्हा मांडला गेला. त्यामुळे संतप्त झालेले सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी त्याला मंजुरीही दिली. ती देत असतानाच त्यांनी विरोधकांसह स्वकीयांचाही समाचार घेतला. गिदड की मौत आती है तब बो स्मशान की तरफ दौडता है, अशी टिप्पणी करत त्यांनी सरनाईक यांच्यावर शरसंधान केले. मी पक्ष बदलून आमदार झालेलो नाही, असे सांगत पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्लाही देत बाहेरून आलेल्यांबाबतच्या संतापाला मोकळी वाट करून दिली होती. त्यामुळे त्यावर आमदार सरनाईक काय बोलतात याबाबत उत्सुकता होती. पण पक्षश्रेष्ठीच याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.मूळात नीळकंठ तसेच रेप्टॉकॉसच्या जागेची मागणी आम्ही केलीच नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. ज्या लोकांनी मतदान करुन निवडून दिले, त्यांची कामे न करता काही जण सुपारी वाजविण्याची कामे करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पक्षातील चर्चेनंतर पुन्हा रेमंडच्या जागेचा ठराव करणे हा पालकमंत्र्यांचाच अपमान आहे आणि तो देखील आपल्याच पक्षातील नगरसेवकांनी अशा पध्दतीने अनुमोदन देत मंजूर केला असेल तर तोही एकप्रकारे पक्षश्रेष्ठींविरोधात जाऊन स्वत:चीच भूमिका मांडल्यासारखा आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री घेतीलच, अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली.आता या विषयावरून पुन्हा कोणाची वैयक्तिक ताकद किती आहे, हे दाखविण्याची वेळ आणू नका, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हस्के यांना दिला. केवळ मूठभर मतांसाठी लाचार होण्यापेक्षा शेकडो लोकांना काय हवे, हे देखील समजत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारण करुच नये, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.यात नक्कीच काही अर्थकारण शिजत असणारस्मशानाच्या बैठकीला बोलावले नाही, असे जर आता कोणी म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. मी प्रत्येकाला बोलावले होते. आमदार केळकर यांचादेखील मला फोन आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.च्या बैठकीत वादावर पडदा पडला असतांना पुन्हा महासभेत हा विषय चर्चेला येतोच, कसा असा सवाल उपस्थित करुन त्यांनी यात काही तरी अर्थकारण नक्कीच शिजत असेल, असा गंभीर आरोप केला. आतापर्यंत जेवढे स्मशानभूमीचे प्रस्ताव पुढे आले, ते कागदावरच राहिले आहेत. आता कुठे स्मशानभूमीबाबत प्रशासन योग्य पावले उचलतांना दिसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना