शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

करचुकवेगिरी करू नका! लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन; लब्धप्रतिष्ठांना दिल्या कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:21 IST

सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करत असते. त्याचे हित व्हावे, असे वाटत असेल तर नियमित कर भरणे, ही समाजातील लब्धप्रतिष्ठांची मुख्य जबाबदारी आहे. अनेकदा कर वाचवण्यासाठी आपण दुकानदारांकडून बिल घेत नाही.

ठाणे : सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करत असते. त्याचे हित व्हावे, असे वाटत असेल तर नियमित कर भरणे, ही समाजातील लब्धप्रतिष्ठांची मुख्य जबाबदारी आहे. अनेकदा कर वाचवण्यासाठी आपण दुकानदारांकडून बिल घेत नाही. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराचा पुरेसा पैसा जमा होत नाही आणि याचा परिणाम देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. करसंकलन पुरेसे झाले नाही, तर नागरिकांना सुविधा कशा देणार, त्यामुळे नागरिकांनी कर चुकवेगिरी करू नये, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शनिवारी केले.रेमण्ड ग्राउंड येथे आयोजित केलेल्या रोटरी डिस्ट्रीक्ट ३१४२ च्या वर्ष २०१७-१८ च्या डिस्कॉन १८ तारांगण वार्षिक परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून रोटरी क्लब जास्तीतजास्त सेवा देण्याचे काम करत आहे. सर्व रोटेरियन सेवा देण्याकरिता झटत असतात. हजारो वर्षांची परंपरा असलेली आपली भारतीय संस्कृती, सभ्यता टिकली आहे. भारताने आपले सांस्कृतिक अस्तित्व टिकवले आहे, हे सांगताना रवींद्रनाथ टागोर यांच्या पंक्ती त्यांनी उद्धृत केल्या. मी लोकसभा अध्यक्षा असल्याने कुणावरही टीकाटिप्पणी करत नाही. देशासाठी काही करायचे असेल, तर ती फक्त सरकारची जबाबदारी नाही. समाजाचा सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.महाजन म्हणाल्या की, अर्थसंकल्प हा जमाखर्चाचा ताळेबंद आहे. आपण जो कर देतो, तोच सरकार देशासाठी खर्च करते. पंतप्रधानांचे स्वप्न आहे की, गरीबांना चांगलं जगता आले पाहिजे. परंतु, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कर भरतो का? अनेकदा आपण कर चुकवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा फटका गोरगरिबांच्या योजनांना बसतो. महिलांना अर्थसंकल्पातून काय मिळाले, असा नेहमी विचारला जाणारा सवाल आहे. परंतु, अर्थसंकल्प हा सर्वांसाठी असतो. महिला या काही समाजापासून वेगळा घटक नाही. अर्थसंकल्पाचा परिणाम हा सर्वांवर सारखाच होत असतो.कर भरल्यामुळे राष्ट्र निर्माण करण्यामध्ये आपली भूमिका महत्त्वाची ठरते. केवळ सेवा नाही तर आपण कोणासाठी काम करतो, हे देखील महत्त्वाचे आहे. विकास हा माणसाकरिता आहे.हे संवादस्थान, नाट्यगृह नव्हे...प्रेक्षागृहातील विद्युतव्यवस्थेबाबत सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, कार्यक्रमाला येणारे वक्ते, प्रमुख अतिथी हे विचार करून किंवा अभ्यास करून आलेले असतात. त्यामुळे हे संवादस्थान आहे, नाट्यगृह नाही.मंचावरून बोलणा-या वक्त्याला किंवा प्रमुख अतिथीला आपण कोणाशी बोलतोय, हेच दिसत नसेल तर त्या संवादाला अर्थ राहत नाही. ज्यांच्याशी संवाद साधायला आलो आहोत, त्यांच्याशी खरंच संवाद साधत आहोत का, असा सवाल त्यांनी केला. लागलीच अंधारात असलेले प्रेक्षागृह प्रकाशमान झाले.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनthaneठाणे