शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकारण आणू नका : विश्वनाथ पाटील

By admin | Updated: October 1, 2015 23:26 IST

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

वाडा : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कुणीही राजकारण आणू नये, असे प्रतिपादन कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वाडा येथे शेतकऱ्यांच्या सभेत केले.३५ सेक्शन, इको-सेन्सेटिव्ह झोन, विविध प्रकल्पांसाठी तसेच महामार्गासाठी संपादित होत असलेली जमीन अशा विविध समस्यांमध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यांतील हजारो शेतकरी अडकले आहेत. या बाधित शेतकऱ्यांची सभा वाडा येथे वाडा तालुका शेतकरी संघटना व कुणबी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी मुरबाडमध्ये माजी आमदार दिगंबर विशे, गोटीराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे शेतकरी उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कर्जमुक्तीच्या मागणीबरोबरच विविध समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढण्याची तयारी करावी, असे आवाहन विश्वनाथ पाटील यांनी या वेळी केले.ठाणे, पालघर जिल्ह्यांतील ४४ हजार शेतकऱ्यांच्या ६७ हजार हेक्टर शेतजमिनीवर वन खात्याने बेकायदेशीर वनसंज्ञा लावून येथील शेतकऱ्यांना नाहक अडचणीत आणल्याचा आरोप माजी आमदार दिगंबर विशे यांनी या वेळी केला. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे, न्यायालयीन लढाई व जनआंदोलन उभारणे, अशा तीन प्रकारची लढाई लढली जाईल, असेही ते म्हणाले. ही सभा यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, उपाध्यक्ष परशुराम सावंत, हरिश्चंद्र पाटील, रंजन पाटील व कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते.