शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकारण आणू नका : विश्वनाथ पाटील

By admin | Updated: October 1, 2015 23:26 IST

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

वाडा : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कुणीही राजकारण आणू नये, असे प्रतिपादन कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वाडा येथे शेतकऱ्यांच्या सभेत केले.३५ सेक्शन, इको-सेन्सेटिव्ह झोन, विविध प्रकल्पांसाठी तसेच महामार्गासाठी संपादित होत असलेली जमीन अशा विविध समस्यांमध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यांतील हजारो शेतकरी अडकले आहेत. या बाधित शेतकऱ्यांची सभा वाडा येथे वाडा तालुका शेतकरी संघटना व कुणबी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी मुरबाडमध्ये माजी आमदार दिगंबर विशे, गोटीराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे शेतकरी उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कर्जमुक्तीच्या मागणीबरोबरच विविध समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढण्याची तयारी करावी, असे आवाहन विश्वनाथ पाटील यांनी या वेळी केले.ठाणे, पालघर जिल्ह्यांतील ४४ हजार शेतकऱ्यांच्या ६७ हजार हेक्टर शेतजमिनीवर वन खात्याने बेकायदेशीर वनसंज्ञा लावून येथील शेतकऱ्यांना नाहक अडचणीत आणल्याचा आरोप माजी आमदार दिगंबर विशे यांनी या वेळी केला. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे, न्यायालयीन लढाई व जनआंदोलन उभारणे, अशा तीन प्रकारची लढाई लढली जाईल, असेही ते म्हणाले. ही सभा यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, उपाध्यक्ष परशुराम सावंत, हरिश्चंद्र पाटील, रंजन पाटील व कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते.