शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

उठा उठा दिवाळी संपली; पाण्याची वेळ झाली

By admin | Updated: November 14, 2015 02:16 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळीकरिता तात्पुरता स्थगित केली होती.

ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळीकरिता तात्पुरता स्थगित केली होती. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांकरिता चार दिवसांची पाण्याची दिवाळी होती. मात्र आता दिवाळी संपल्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्याच्या प्रारंभापासून पाणी कपातीचे तीव्र चटके जाणवू लागणार आहेत. परिणामी सुट्टीच्या दिवशीही झोपेतून डोळे चोळत उठत पाणी येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत बसावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्यांतील वेगवेगळ््या महापालिका क्षेत्रात वेगवेगळ््या दिवशी चोवीस तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी व विशेष करून दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. याखेरीज अचानक जलवाहिनी फुटली किंवा दुरुस्ती-देखभालीचे काम करावे लागले तर पाणी कपातीच्या दिवसांत भर पडणार आहे. पुढील वर्षीच्या जून-जुलै महिन्यापर्यंत या कपातीचा सामना करायचा आहे. (प्रतिनिधी)ठाणेकरांना येत्या बुधवारपासून ४५ टक्के पाणी कपातीचे संकट असल्याने त्यांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला आजच्या घडीला ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. पाणीकपातीमुळे ठाणे शहराला बुधवार तर कळवा, मुंब्य्राला गुरुवार व शुक्रवार दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम कंपनीकडील उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. तर एमआयडीसीनेदेखील दोन दिवस पाणीकपातीचे संकेत दिल्याने आता रोज १५ टक्याबरोबरच दोन दिवस पूर्णपणे शटडाऊन घेण्यात येणार असल्याने ठाणेकरांपुढे भीषण संकट उभे ठाकले आहे. डोंबिवली-कल्याण ३० टक्के पाणीकपातच्डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात ३० टक्के पाणीकपात लागू केलेली आहे. शनिवारपासून म्हणजे दिवाळीनंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरु होईल. महापालिका हद्दीत सध्या मंगळवार आणि शनिवार हे कल्याण-डोंबिवलीसह टिटवाळापर्यंत पाणीकपात केली जाते. तर बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांमध्ये एमआयडीसीकडून २७ गावांसह एमआयडीसी क्षेत्रात ती केली जाते. या दोन्ही ठिकाणी ३० टक्के ती केली जाते. च्कल्याण पूर्वेत सरासरी प्रतीदिन ३० टक्के पाणीकपात केली जाते. ठिकाणी आनंदवाडी, अशोक नगर, हनुमान नगर, तीसगाव नाका, चक्की नाका या ठिकाणी पाणीगळती होेते. ज्यांना पाणी हवे आहे त्या सोसायट्यांना ३२० रुपये भरल्यास रितसर टँकरने पाणी दिले जाते. पेंडसेनगरातील पाण्याच्या टाकी केंद्रातून पाणी वितरीत होते.च्महापालिका क्षेत्रात २७ गावे धरुन दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाणी वितरीत होते. त्यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो, ती वगळता महापालिका ३०५-१० एमएलडी पाणी वितरीत करते. आंध्रा आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा खालावलेला असून एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसऱ्या ठिकाणी केवळ ५६टक्केच पाणीसाठा आहे.