शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

उठा उठा दिवाळी संपली; पाण्याची वेळ झाली

By admin | Updated: November 14, 2015 02:16 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळीकरिता तात्पुरता स्थगित केली होती.

ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळीकरिता तात्पुरता स्थगित केली होती. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांकरिता चार दिवसांची पाण्याची दिवाळी होती. मात्र आता दिवाळी संपल्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्याच्या प्रारंभापासून पाणी कपातीचे तीव्र चटके जाणवू लागणार आहेत. परिणामी सुट्टीच्या दिवशीही झोपेतून डोळे चोळत उठत पाणी येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत बसावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्यांतील वेगवेगळ््या महापालिका क्षेत्रात वेगवेगळ््या दिवशी चोवीस तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी व विशेष करून दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. याखेरीज अचानक जलवाहिनी फुटली किंवा दुरुस्ती-देखभालीचे काम करावे लागले तर पाणी कपातीच्या दिवसांत भर पडणार आहे. पुढील वर्षीच्या जून-जुलै महिन्यापर्यंत या कपातीचा सामना करायचा आहे. (प्रतिनिधी)ठाणेकरांना येत्या बुधवारपासून ४५ टक्के पाणी कपातीचे संकट असल्याने त्यांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला आजच्या घडीला ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. पाणीकपातीमुळे ठाणे शहराला बुधवार तर कळवा, मुंब्य्राला गुरुवार व शुक्रवार दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम कंपनीकडील उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. तर एमआयडीसीनेदेखील दोन दिवस पाणीकपातीचे संकेत दिल्याने आता रोज १५ टक्याबरोबरच दोन दिवस पूर्णपणे शटडाऊन घेण्यात येणार असल्याने ठाणेकरांपुढे भीषण संकट उभे ठाकले आहे. डोंबिवली-कल्याण ३० टक्के पाणीकपातच्डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात ३० टक्के पाणीकपात लागू केलेली आहे. शनिवारपासून म्हणजे दिवाळीनंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरु होईल. महापालिका हद्दीत सध्या मंगळवार आणि शनिवार हे कल्याण-डोंबिवलीसह टिटवाळापर्यंत पाणीकपात केली जाते. तर बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांमध्ये एमआयडीसीकडून २७ गावांसह एमआयडीसी क्षेत्रात ती केली जाते. या दोन्ही ठिकाणी ३० टक्के ती केली जाते. च्कल्याण पूर्वेत सरासरी प्रतीदिन ३० टक्के पाणीकपात केली जाते. ठिकाणी आनंदवाडी, अशोक नगर, हनुमान नगर, तीसगाव नाका, चक्की नाका या ठिकाणी पाणीगळती होेते. ज्यांना पाणी हवे आहे त्या सोसायट्यांना ३२० रुपये भरल्यास रितसर टँकरने पाणी दिले जाते. पेंडसेनगरातील पाण्याच्या टाकी केंद्रातून पाणी वितरीत होते.च्महापालिका क्षेत्रात २७ गावे धरुन दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाणी वितरीत होते. त्यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो, ती वगळता महापालिका ३०५-१० एमएलडी पाणी वितरीत करते. आंध्रा आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा खालावलेला असून एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसऱ्या ठिकाणी केवळ ५६टक्केच पाणीसाठा आहे.