शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करा, कल्याण वेगळा जिल्ह्याची मागणी; वरीष्ठ पातळीवर निर्णय घेण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे आश्वासन

By अजित मांडके | Updated: January 8, 2024 15:59 IST

पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण जिल्हा हा वेगळा करावा अशी मागणी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली.

ठाणे :  पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण जिल्हा हा वेगळा करावा अशी मागणी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली. तसेच या संदर्भातील ठराव देखील करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मात्र पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी अशा पध्दतीने या बैठकीत तसा ठराव करता येणार नसल्याचे सांगितले. या संदर्भात सर्व पक्षीयांशी चर्चा करुन वरीष्ठांशी चर्चा करुन त्यानुसार पुढील निर्णय घ्यायचा की नाही? हे निश्चित करता येईल असे स्पष्ट केले.

ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. कल्याण ते थेट कर्जत पर्यंत हा जिल्हा असावा असेही यात नमुद करण्यात आले आहे. कर्जत मधील नागरीकांना आपल्या विविध गोष्टींसाठी किंवा शासकीय कामांसाठी अलिबागला जावे लागत आहे. त्यामुळे तो फार लांबचा फेरा पडत आहे. त्यामुळे कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्याने येथील नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्या अनुषगांने ही मागणी करण्यात आली होती.

त्यातही कल्याणमध्ये सर्व सोई सुविधा आहे, याच ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे, न्यायालय आहे. बाजारपेठ असून कृषी उत्पन्न बाजार समिती देखील या ठिकाणी आहे. त्यातही दळण वळणाची रेल्वेसह इतर साधणे देखील उपलब्ध आहे. याशिवाय मागील काही वर्षात येथील लोकसंख्या वाढली असून सोई सुविधांवर देखील ताण येऊ लागला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या धर्तीवर कल्याण जिल्हा करण्यात यावा अशी मागणी लावून धरण्यात आली आहे.दरम्यान सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण जिल्ह्याची मागणी लावून धरली. तसेच या संदर्भातील ठराव देखील याच बैठकीत करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.

परंतु अशी पध्दतीने जिल्हा विभाजनाचा ठराव करता येणे शक्य नसल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. यापेक्षा सर्व पक्षीय आमदारांशी चर्चा करुन, वरीष्ठ नेते मंडळी आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मग त्यावर जो काही योग्य निर्णय घेता येईल तो घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.