शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करा, कल्याण वेगळा जिल्ह्याची मागणी; वरीष्ठ पातळीवर निर्णय घेण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे आश्वासन

By अजित मांडके | Updated: January 8, 2024 15:59 IST

पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण जिल्हा हा वेगळा करावा अशी मागणी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली.

ठाणे :  पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण जिल्हा हा वेगळा करावा अशी मागणी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली. तसेच या संदर्भातील ठराव देखील करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मात्र पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी अशा पध्दतीने या बैठकीत तसा ठराव करता येणार नसल्याचे सांगितले. या संदर्भात सर्व पक्षीयांशी चर्चा करुन वरीष्ठांशी चर्चा करुन त्यानुसार पुढील निर्णय घ्यायचा की नाही? हे निश्चित करता येईल असे स्पष्ट केले.

ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. कल्याण ते थेट कर्जत पर्यंत हा जिल्हा असावा असेही यात नमुद करण्यात आले आहे. कर्जत मधील नागरीकांना आपल्या विविध गोष्टींसाठी किंवा शासकीय कामांसाठी अलिबागला जावे लागत आहे. त्यामुळे तो फार लांबचा फेरा पडत आहे. त्यामुळे कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्याने येथील नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्या अनुषगांने ही मागणी करण्यात आली होती.

त्यातही कल्याणमध्ये सर्व सोई सुविधा आहे, याच ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे, न्यायालय आहे. बाजारपेठ असून कृषी उत्पन्न बाजार समिती देखील या ठिकाणी आहे. त्यातही दळण वळणाची रेल्वेसह इतर साधणे देखील उपलब्ध आहे. याशिवाय मागील काही वर्षात येथील लोकसंख्या वाढली असून सोई सुविधांवर देखील ताण येऊ लागला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या धर्तीवर कल्याण जिल्हा करण्यात यावा अशी मागणी लावून धरण्यात आली आहे.दरम्यान सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण जिल्ह्याची मागणी लावून धरली. तसेच या संदर्भातील ठराव देखील याच बैठकीत करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.

परंतु अशी पध्दतीने जिल्हा विभाजनाचा ठराव करता येणे शक्य नसल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. यापेक्षा सर्व पक्षीय आमदारांशी चर्चा करुन, वरीष्ठ नेते मंडळी आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मग त्यावर जो काही योग्य निर्णय घेता येईल तो घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.