शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

दिवा डम्पिंग होणार कचरामुक्त, मात्र मोकळ्या होणाऱ्या जागेवरुन वाढणार संघर्ष

By अजित मांडके | Updated: April 12, 2023 16:59 IST

ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद ...

ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद करुन पूर्वी जशी जमीन होती, तशीच जमीन देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने याचा सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सुमारे ६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च केंद्राकडून अपेक्षित धरण्यात आला आहे. तर महापालिका त्यात २५ कोटींचा खर्च करणार आहे. परंतु दीड वर्षानंतर मोकळ्या होणाºया या जागेवर आतापासूनच अनेकांनी हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन संघर्ष पहावयास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील कित्येक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा येथील क्षपण भुमीवर कचरा टाकला जात होता. याठिकाणी रोजच्या रोज सुमारे १ हजार मेट्रीक टन कचरा टाकला जात होता. आता मागील काही महिन्यापासून येथील डम्पिंग कायमचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून येथे कचरा टाकला जात असल्याने आजही येथे धुराचे लोळ उडतांना दिसत आहेत. त्यातही याठिकाणी मिथेन वायुचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे डम्पिंग बंद झाले असले तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही.

येथील डम्पिंग कायमचे बंद झाल्यानंतर येथील कचऱ्याची शास्त्रक्तोपद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या हालचाली पालिकेने केल्या आहेत. त्यानुसार या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी दिड वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले. त्यानुसार त्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी तब्बल ६५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यातील ४० कोटी केंद्र सरकारकडून आणि २५ कोटी पालिका खर्च करणार आहे. याठिकाणी आजच्या घडीला ११ लाख मेट्रीक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. दिड वर्षानंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करुन दिली जाणार आहे.

असे असले तरी देखील आतापासून या जमीनीवर अनेकांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने देखील ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काही नागरीकांनी देखील यातील जमीन आपली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच संघर्षाची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे. परंतु दीड वर्षानंतर ही जागा कोणाची आहे, त्यावर कोणा कोणाचा हक्क असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :divaदिवाthaneठाणे