शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दिवा डम्पिंग होणार कचरामुक्त, मात्र मोकळ्या होणाऱ्या जागेवरुन वाढणार संघर्ष

By अजित मांडके | Updated: April 12, 2023 16:59 IST

ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद ...

ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद करुन पूर्वी जशी जमीन होती, तशीच जमीन देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने याचा सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सुमारे ६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च केंद्राकडून अपेक्षित धरण्यात आला आहे. तर महापालिका त्यात २५ कोटींचा खर्च करणार आहे. परंतु दीड वर्षानंतर मोकळ्या होणाºया या जागेवर आतापासूनच अनेकांनी हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन संघर्ष पहावयास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील कित्येक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा येथील क्षपण भुमीवर कचरा टाकला जात होता. याठिकाणी रोजच्या रोज सुमारे १ हजार मेट्रीक टन कचरा टाकला जात होता. आता मागील काही महिन्यापासून येथील डम्पिंग कायमचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून येथे कचरा टाकला जात असल्याने आजही येथे धुराचे लोळ उडतांना दिसत आहेत. त्यातही याठिकाणी मिथेन वायुचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे डम्पिंग बंद झाले असले तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही.

येथील डम्पिंग कायमचे बंद झाल्यानंतर येथील कचऱ्याची शास्त्रक्तोपद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या हालचाली पालिकेने केल्या आहेत. त्यानुसार या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी दिड वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले. त्यानुसार त्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी तब्बल ६५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यातील ४० कोटी केंद्र सरकारकडून आणि २५ कोटी पालिका खर्च करणार आहे. याठिकाणी आजच्या घडीला ११ लाख मेट्रीक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. दिड वर्षानंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करुन दिली जाणार आहे.

असे असले तरी देखील आतापासून या जमीनीवर अनेकांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने देखील ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काही नागरीकांनी देखील यातील जमीन आपली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच संघर्षाची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे. परंतु दीड वर्षानंतर ही जागा कोणाची आहे, त्यावर कोणा कोणाचा हक्क असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :divaदिवाthaneठाणे