शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

दिवा डम्पिंग होणार कचरामुक्त, मात्र मोकळ्या होणाऱ्या जागेवरुन वाढणार संघर्ष

By अजित मांडके | Updated: April 12, 2023 16:59 IST

ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद ...

ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद करुन पूर्वी जशी जमीन होती, तशीच जमीन देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने याचा सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सुमारे ६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च केंद्राकडून अपेक्षित धरण्यात आला आहे. तर महापालिका त्यात २५ कोटींचा खर्च करणार आहे. परंतु दीड वर्षानंतर मोकळ्या होणाºया या जागेवर आतापासूनच अनेकांनी हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन संघर्ष पहावयास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील कित्येक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा येथील क्षपण भुमीवर कचरा टाकला जात होता. याठिकाणी रोजच्या रोज सुमारे १ हजार मेट्रीक टन कचरा टाकला जात होता. आता मागील काही महिन्यापासून येथील डम्पिंग कायमचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून येथे कचरा टाकला जात असल्याने आजही येथे धुराचे लोळ उडतांना दिसत आहेत. त्यातही याठिकाणी मिथेन वायुचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे डम्पिंग बंद झाले असले तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही.

येथील डम्पिंग कायमचे बंद झाल्यानंतर येथील कचऱ्याची शास्त्रक्तोपद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या हालचाली पालिकेने केल्या आहेत. त्यानुसार या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी दिड वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले. त्यानुसार त्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी तब्बल ६५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यातील ४० कोटी केंद्र सरकारकडून आणि २५ कोटी पालिका खर्च करणार आहे. याठिकाणी आजच्या घडीला ११ लाख मेट्रीक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. दिड वर्षानंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करुन दिली जाणार आहे.

असे असले तरी देखील आतापासून या जमीनीवर अनेकांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने देखील ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काही नागरीकांनी देखील यातील जमीन आपली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच संघर्षाची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे. परंतु दीड वर्षानंतर ही जागा कोणाची आहे, त्यावर कोणा कोणाचा हक्क असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :divaदिवाthaneठाणे