शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

जिल्हा नियोजन समितीचा निधी उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीसाठी ९० लाख 

By सदानंद नाईक | Updated: February 7, 2024 16:50 IST

या कामाची निविदा टाळण्यासाठी प्रत्येकी १० लाख किमंतीची एकून २१ विकास कामाला मंजुरी दिल्याचा आरोप समाजसेवक अजित माखिजानी यांनी केला.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शांतीनगर स्मशानभूमीतील विविध कामे करण्यासाठी ९० लाख तर महापालिका प्रभाग क्रं-६ मधील नाली व फुटपाथ रस्त्याला १ कोटी २० लाखाचा निधी जिल्हा नियोजन समितीने दिला. या कामाची निविदा टाळण्यासाठी प्रत्येकी १० लाख किंमतीची एकून २१ विकास कामाला मंजुरी दिल्याचा आरोप समाजसेवक अजित माखिजानी यांनी केला.

उल्हासनगरात विकास कामाच्या टेंडरवरून १०० कोटीचा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी केल्याने, शहर भाजप व शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचे चित्र होते. त्यानंतर टेंडरवारवरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घुमजाव केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.

टेंडर घोटाळा प्रकरण थंड होत नाही, त्या दरम्यान हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपच्या आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणपूर्व शहरप्रमुखाला गोळ्या घातल्या. या प्रकाराने शहरातील नव्हेतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक अजीत माखिजानी यांनी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या विकास कामात घोळ असल्याचा आरोप केला.

महापालिकेने प्रस्तावित केलेल्या कामा पैकी शांतीनगर स्मशानभूमीतील विविध कामासाठी ९० लाख तर प्रभाग क्रं-६ मधील नाली व सीसी रस्त्यासाठी १ कोटी २० लाखाच्या निधीला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. मात्र दोन्ही विकास कामाच्या निविदा न काढता प्रत्येकी १० लाख किंमतीच्या एकून २१ कामाला मंजुरी दिली. स्मशानभूमीतील ९० लाखाचे एकून ९ विविध कामे एकाच ठेकेदाराला तर प्रभाग क्रं-६ मधील १ कोटी २० लाखाची एकून १२ कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आल्याचा प्रताप घडल्याचे आरोप सर्वस्तरातून होत आहे.

२१ कामासाठी २ कोटी १० लाख 

जिल्हा नियोजन समितीने एकून २१ कामासाठी २ कोटी १० लाखाच्या निधीला मंजुरी दिली. मात्र यामध्ये ७० टक्के निधी जिल्हा नियोजन समितीचा तर ३० टक्के निधी महापालिकेचा असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिका बांधकाम विभागाची आहे.

जिल्हा नियोजन समितीवर प्रश्नचिन्हे?

महापालिकेने प्रस्तावित केलेल्या विविध कामांपैकी फक्त स्मशानभूमी व प्रभाग क्रं-६ मधील विकास कामालाच प्राध्यान्य का? इतर शहरात विकास कामाबाबत आलबेल आहे का? याबाबतचा प्रश्न करून जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्हे उभे केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर