शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्हा नियोजन समितीचा निधी उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीसाठी ९० लाख 

By सदानंद नाईक | Updated: February 7, 2024 16:50 IST

या कामाची निविदा टाळण्यासाठी प्रत्येकी १० लाख किमंतीची एकून २१ विकास कामाला मंजुरी दिल्याचा आरोप समाजसेवक अजित माखिजानी यांनी केला.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शांतीनगर स्मशानभूमीतील विविध कामे करण्यासाठी ९० लाख तर महापालिका प्रभाग क्रं-६ मधील नाली व फुटपाथ रस्त्याला १ कोटी २० लाखाचा निधी जिल्हा नियोजन समितीने दिला. या कामाची निविदा टाळण्यासाठी प्रत्येकी १० लाख किंमतीची एकून २१ विकास कामाला मंजुरी दिल्याचा आरोप समाजसेवक अजित माखिजानी यांनी केला.

उल्हासनगरात विकास कामाच्या टेंडरवरून १०० कोटीचा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी केल्याने, शहर भाजप व शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचे चित्र होते. त्यानंतर टेंडरवारवरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घुमजाव केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.

टेंडर घोटाळा प्रकरण थंड होत नाही, त्या दरम्यान हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपच्या आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणपूर्व शहरप्रमुखाला गोळ्या घातल्या. या प्रकाराने शहरातील नव्हेतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक अजीत माखिजानी यांनी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या विकास कामात घोळ असल्याचा आरोप केला.

महापालिकेने प्रस्तावित केलेल्या कामा पैकी शांतीनगर स्मशानभूमीतील विविध कामासाठी ९० लाख तर प्रभाग क्रं-६ मधील नाली व सीसी रस्त्यासाठी १ कोटी २० लाखाच्या निधीला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. मात्र दोन्ही विकास कामाच्या निविदा न काढता प्रत्येकी १० लाख किंमतीच्या एकून २१ कामाला मंजुरी दिली. स्मशानभूमीतील ९० लाखाचे एकून ९ विविध कामे एकाच ठेकेदाराला तर प्रभाग क्रं-६ मधील १ कोटी २० लाखाची एकून १२ कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आल्याचा प्रताप घडल्याचे आरोप सर्वस्तरातून होत आहे.

२१ कामासाठी २ कोटी १० लाख 

जिल्हा नियोजन समितीने एकून २१ कामासाठी २ कोटी १० लाखाच्या निधीला मंजुरी दिली. मात्र यामध्ये ७० टक्के निधी जिल्हा नियोजन समितीचा तर ३० टक्के निधी महापालिकेचा असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिका बांधकाम विभागाची आहे.

जिल्हा नियोजन समितीवर प्रश्नचिन्हे?

महापालिकेने प्रस्तावित केलेल्या विविध कामांपैकी फक्त स्मशानभूमी व प्रभाग क्रं-६ मधील विकास कामालाच प्राध्यान्य का? इतर शहरात विकास कामाबाबत आलबेल आहे का? याबाबतचा प्रश्न करून जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्हे उभे केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर