शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत घोडेबाजाराला वेग

By admin | Updated: March 8, 2016 01:38 IST

पालघरच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक उद्या (मंगळवारी) होत असून नऊ जागांसाठी बारा उमेदवारामध्ये लढती रंगणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षानी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून

पालघर : पालघरच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक उद्या (मंगळवारी) होत असून नऊ जागांसाठी बारा उमेदवारामध्ये लढती रंगणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षानी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून आज दिवसभर मतदाराच्या फोडाफोडीसाठी अनेक बैठका रंगल्याचे चित्र दिसून येत होते.पालघर जिल्हापरीषदेच्या ५७ सदस्यापैकी, भाजपाकडे २१ सदस्य, शिवसेनेकडे १५ व बंडखोरीकरून विजयी झालेल्या अपक्ष असे १६ उमेदवार असून बहुजन विकास आघाडीकडे १०, माकपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व काँग्रेसचा १ असे बलाबल असून सर्व पक्षांनी एकत्र येत १३ जागावर बिनविरोध निवड करून घेतली.जिल्हापरिषद गटामध्ये पाच जागासाठी सहा उमेदवार रिंगणात असून भाजपाचे तीन व शिवसेनेच्या दोघांचा अंतर्भाव आहे. याच गटामधून राष्ट्रवादीच्या दामोदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यातून दामोदर पाटील यांचे नाव राष्ट्रवादीने सुचविले नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असून राष्ट्रवादीने काशिनाथ चौधरी यांना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उभे केले आहे. राष्ट्रवादीच्या या पावित्र्यामुळे जि. प. गटातून निवडणुक होत आहे.महानगरपालिका गटामध्ये तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असले तरी वसई-विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीकडे ११५ नगरसेवकांपैकी १०९ नगरसेवक आहेत. त्यामुळे बविआचा एकतर्फी विजय होणार आहे. तर नगरपालिका गटामध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि शिवसेनेचे अतुल पाठक या पालघर नगरपरिषदेतील नगरसेवकांमध्ये सरळ सरळ लढत होत असून पालघर, जव्हार व डहाणू मधील एकूण ५८ नगरसेवक मतदार असल्याने राष्ट्रवादीपक्षाकडे २९ नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे दोन असे एकूण ३१ संस्थाबळ तर सेनेकडे २२ व भाजपाकडे पाच असे २७ चे संख्याबळ आहे. परंतु राष्ट्रवादीला पाठींबा देण्याबाबत काँग्रेसच्या नगरसेवकांना अजुन कुठल्याही सुचना आल्या नसल्याची माहिती काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. त्यामुळे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यात सेना-भाजपा उमेदवार यशस्वी झाल्यास दोघांचे समसमान संख्याबळ होणार आहे. त्या दृष्टीने आज सकाळपासून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. (वार्ताहर)